SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा गेल्या हंगामातील रु. १०० चा हप्ता जमा : अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांची माहितीपाश्चात्त्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामध्ये समृद्ध हिंदू संस्कृती आणि धार्मिक परंपरा टिकवून ठेवणे आवश्यक : आमदार राजेश क्षीरसागरडी. वाय. पाटील अभियांत्रिकी एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सबिनविरोधच्या चर्चेत तथ्य नाही, गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार : आमदार सतेज पाटीलसीबीएसई साऊथ झोन-२ बॉक्सिंग स्पर्धेचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजनपंढरपुरातील भक्तनिवास शिरोळ तालुक्यातील वारकऱ्यांसाठी मोठा आधार ठरेल : आमदार यड्रावकरकोल्हापूर शहराचा कायम स्वरूपी पाणी प्रश्न सोडवण्याला प्राधान्य : आ. राजेश क्षीरसागरसन्मान ..... कर्तृत्वाचा !कोल्हापूर जिल्ह्यातील 10 बंधारे पाण्याखालीप्रा. यास्मिन शेख यांचे पुण्यात निधन; मराठीवरील प्रभुत्त्व, निस्सीम प्रेमाचा उत्तुंग आदर्श: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

जाहिरात

 

पाश्चात्त्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामध्ये समृद्ध हिंदू संस्कृती आणि धार्मिक परंपरा टिकवून ठेवणे आवश्यक : आमदार राजेश क्षीरसागर

schedule24 Aug 26 person by visibility 186 categoryसामाजिक

 हिंदू धर्म संघटना आयोजित श्रावण व्रत वैकल्यात समस्त हिंदू जनांचा सामुदायिक उपवास सोडण्याचा कार्यक्रम संपन्न

  

कोल्हापूर : हिंदू धर्म हा भारतीय उपखंडातील सर्वात मोठा आणि महत्वाचा धर्म आहे. या धर्मात अनेक जाती, वर्ण आदी सर्व रूपे एकत्रितपणे सुखाने नांदत आहेत. सर्वांना सामाऊन घेणारा आणि देशाभिमान जपणारा हिंदू धर्म महान असून, देश विघातक विकृती आणि कृत्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी हिंदू धर्मीयांची संघटीत शक्ती जागृत झाली आहे. श्रावण व्रतवैकल्य सारख्या कार्यक्रमांमुळे हिंदू धर्मीयांची एकजूट अधिक शक्तिशाली बनली आहे. संघटीत शक्तीच्या बळावर हिंदू धर्मीय देशविघातक कृत्यांचा समूळ नायनाट करतील. आजच्या पाश्च्यात्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामध्ये समृद्ध हिंदू संस्कृती आणि धार्मिक परंपरा टिकवून ठेवणे आवश्यक असून, येणाऱ्या पिठीवर सुसंस्कार करण्यासाठी हिंदू धर्म शिक्षण वर्गांचे आयोजन आगामी काळात करण्यात येईल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी नष्टे लॉन, कोल्हापूर येथे “श्रावण व्रत वैकल्य” या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

या श्रावण व्रतवैकल्य कार्यक्रमाकरिता जेष्ठ हिंदुत्ववादी आणि शिवसैनिक कमलाकर किलकिले सकाळी कावडीने पंचगंगा नदी तीरावरून कावडीने पाणी आणले. या पाण्याचे कार्यक्रमस्थळी सवाद्य स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात कमलाकर किलकिले यांनी पवित्र पंचगंगा नदी तीरावरून आणलेल्या जलाने श्री महादेवाच्या पिंडीस आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस जलाभिषेकाने झाली. यानंतर गोमाता पूजन आणि ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर अकरा नवदाम्पत्यांच्या उपस्थितीत महायज्ञास सुरवात करण्यात आली. याकरिता हिंदू धर्मातील अनेक जातीपंतातील मान्यवर यजमान उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिंदू देवतांचे पूजन आणि आरती करण्यात आली. यासह भारत भारतमातेची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. यावेळी "वंदे मातरम्", "भारत माता कि जय" "हिंदू धर्म कि जय" अशा घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमावेळी एकाचवेळी १०८ जोडपी केळीच्या पानांवर मंत्र घोषात सात्विक भोजनाद्वारे आपला उपवास सोडला. यानंतर या कार्यक्रमाचा सुमारे पाच हजार हिंदू जणांनी लाभ घेतला. यावेळी एस्कोन भजनी मंडळाचा जप आणि भजनानी उपस्थित हिंदूजणांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमस्थळी भगवान श्रीकृष्ण, भारतमाता, स्वामी विवेकांनद, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अनेक देवतांच्या प्रतिकृतीचे पूजन करण्यात आले. त्याचबरोबर भोजन मंडपामध्ये हिंदू धर्माचे मार्गदर्शनपर बोधावाक्यांचे फलक लावणेत आले होते. कोल्हापूर ब्राम्हण पुरोहित संघ यांनी या कार्यक्रमाचे पौरीहीत्य केले.

यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, हिंदू धर्मातील सणांची महती सर्वाना व्हावी, हिंदू धर्माचे जागरण व संघटन व्हावे, याकरिता १३ वर्षांपूर्वी समस्त हिंदू धर्म संघटनाच्या वतीने श्रावण व्रत- वैकल्य या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाची सुरवात झाली. हिंदू धर्म प्रगतीचे काम व्हावे, हिंदू संस्कृती जपण्याचे कार्य या माध्यमातून व्हावे या हेतूने या उपक्रमाची सुरवात करण्यात होती. या उपक्रमास शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमाचे अनुकरण राज्यभरात होऊ लागल्याने या उपक्रमाची सुरवात कोल्हापुरातून केली याचा आनंद होत आहे. या उपक्रमातून हिंदू धर्मीयांची एकजूट दिसून येत आहे. हिंदू धर्मीयांची ही एकजूट अधिक मजबूत बनत चालली असून, हिंदू धर्मियांच्या "लव्ह जिहाद कायदा, गो हत्या बंदी कायदा, प्रार्थनास्थळांवरील भोंगे" अशा महत्वाच्या मागण्याही महायुती सरकारनेही मान्य केल्या आहेत. अशीच हिंदू धर्मीयांची एकजूट अखंडीत राहून या उपक्रमाचे स्वरूप या पेक्षाही मोठे होऊन संपूर्ण देशभरात श्रावण व्रत वैकल्य उपक्रम व्हावा, अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेविका वंदना मोहिते, युवानेते पुष्कराज क्षीरसागर, नगरसेवक प्रसाद चव्हाण, यादव महाराज, सुधीर जोशी वंदूरकर, बाबा वाघापुरकर, परिवहन सदस्य रोहन अतिग्रे, कमलाकर किलकीले, उदय भोसले, चंद्रकांत बराले, शिवाजी जाधव, किशोर घाटगे, कमलाकर जगदाळे, अर्जुन आंबी, मधुकर नाझरे आदी हिंदुत्ववादी संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes