![](_SMPNews/u/pos/202406/1000801738--800.jpg)
वारणा नगर : शिक्षकांनी नवीन शैक्षणिक धोरण आत्मसात करणे गरजेचे आहे, शाळांमधून विध्यार्थ्यांना जगात वावरण्याचं ज्ञान देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. आणि ती शिक्षकाने सक्षम वर्गाध्यापन करून सामर्थ्य ने पार पाडली पाहिजे असे मत प्राचार्य सुस्मिता मोहत्तीं यांनी वारणा नगर येथे बोलताना व्यक्त केले.
तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी मध्ये शिक्षक क्षमता विकास कार्यशाळा शिबिराचे उदघाटन प्रसंगी श्रीमती मोहत्तीं बोलत होत्या, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही व्ही करजनी हे होते.
यावेळी बोलताना डॉ. करजींनी बोलताना म्हणाले आज शिक्षकांनी बदलत्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतः ला तयार केले पाहिजे शिक्षक म्हणून येणाऱ्या काळातील शैक्षणिक बदल शिक्षकांनी आत्मसात केले पाहिजेत या उद्देशाने या क्षमता विकास कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यक्रमात स्वागत मिलिटरी अकॅडमी चे प्राचार्य टी बी रहाटवळ यांनी केले तर प्रास्ताविक शिबीर संयोजक प्राचार्य एम.टी.कलाधारण यांनी केले.
या कार्यशाळेत पहिल्या सत्रात आनंदी शिक्षण या विषयावर वारणा विद्यापीठाच्या परीक्षा विभाग संचालक डॉ. प्रा. शोभा कुंबार यांचे शिक्षकांना मार्गदर्शन झाले. दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांचा भावनिक व सामाजिक विकास या विषयावर नवोदय विद्यालय लखनऊ चे सेवा निवृत्त सहायक आयुक्त डॉ.देवेंद्रसिंग यादव यांनी मार्गदर्शन केले.तर प्रभावी शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर व्याख्यान दिले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.पी आर पगारेपाटील, व आर एम मस्कर यांनी केले आभार प्रशांत जाधव यांनी मानले .