SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ होणार नाहीभाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची दिल्ली विद्यापीठाला भेट, महाविद्यालयीन निवडणुकीची कार्यपद्धती घेतली जाणूनप्रा. वसिफा कोतवाल यांना डॉक्टरेट ​"६३ वर्षांची उज्ज्वल परंपरा अन् नवी झेप! गोकुळच्या वर्धापन दिनानिमित्त 'गोकुळ आईस्क्रीम' लाँच आणि बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन"'पालकत्वाचा लढा होईल सोपा; पद्माराजे हायस्कूलचा मदतीचा हात!'स्वच्छ कोल्हापूरसाठी महापालिका सरसावली; सुभाषनगर आणि वर्षानगर परिसरात राबवली धडक स्वच्छता मोहीम!वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापनवरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उद्ध्वस्त; शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, सिलिंडरचा साठा जप्त!धनगर आरक्षणासाठी महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजेव्हा भारतीय पडदा पहिल्यांदा बोलू लागला...

जाहिरात

 

वीज दरवाढीतून महावितरणचा जनतेच्या खिशावर दरोडा : सतेज पाटील यांचा आरोप : प्रस्तावित वीज दरवाढीवर सुनावणी

schedule06 Feb 26 person by visibility 351 categoryराज्य

कोल्हापूर : एकीकडे महायुतीचे सरकार दावोसला जाऊन ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीची स्वप्ने दाखवते आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील उद्योगांना देशातील सर्वात महागडी वीज पुरवते. जर महाराष्ट्रात उद्योगांसाठी वीज दर इतर राज्यांपेक्षा जास्त असतील, तर नवीन गुंतवणूकदार येथे का येतील असा सवाल करत वीज दरवाढीतून महावितरण जनतेच्या खिशावर दरोडा टाकत असल्याचा आरोप काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी केला. महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर महावितरणच्या प्रस्तावित वीज दरवाढीवर शुक्रवारी सुनावणी झाली. या सुनावणीला आमदार पाटील यांनी ऑनलाईन उपस्थित राहत भूमिका मांडली.

आमदार पाटील म्हणाले, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या धामधुमीत, सामान्य नागरिक आणि शेतकरी यात सहभागी होऊ शकणार नाहीत, हे माहीत असूनही आडमुठेपणाने ही सुनावणी रेटून नेली. राज्यातील ३.५ कोटी वीजग्राहकांवर १ लाख ३५ हजार कोटी रुपयांची वीजदरवाढ दरवाढ अन्यायकारक, अतार्किक आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी घातक आहे. सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. हा लढा केवळ वीज बिलाचा नाही, तर सरकारच्या मनमानी कारभाराविरुद्ध आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक भवितव्यासाठी आहे. आधीच महागाईने पिचलेल्या सामान्य माणसाला, शेतकऱ्याला आणि छोट्या व्यावसायिकाला हा भुर्दंड सहन न होणारा आहे. शेती पंपांच्या वीज दरात वाढ झाल्यास आधीच संकटात असलेला बळीराजा आणखीनच कर्जबाजारी होईल, अशी भीतीही आमदार पाटील यांनी व्यक्त केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes