SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील विद्यापीठाचा ‘टाटा स्किल्स’ सोबत सामंजस्य करारविभागीय कार्यालय स्तरावर नागरिकांच्या तक्रारी सोडवा; अतिक्रमणावर सातत्याने कारवाई करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडसंजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १४वा वर्धापनदिन उत्साहात साजराएकल महिलांची नोंदणी करण्यासाठी महापालिकेचे सर्वेक्षण सुरूकळंबा तर्फे ठाणे उपसरपंचपदी मीना गौड यांची बिनविरोध निवडजगातील पहिली प्रवासी विमानसेवा: लंडन ते पॅरिससरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा गेल्या हंगामातील रु. १०० चा हप्ता जमा : अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांची माहितीपाश्चात्त्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामध्ये समृद्ध हिंदू संस्कृती आणि धार्मिक परंपरा टिकवून ठेवणे आवश्यक : आमदार राजेश क्षीरसागरडी. वाय. पाटील अभियांत्रिकी एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सबिनविरोधच्या चर्चेत तथ्य नाही, गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार : आमदार सतेज पाटील

जाहिरात

 

कोल्हापुरात मोठी कारवाई: १५ पोलीस ठाण्यांमधील ५१५ किलोहून अधिक अमली पदार्थ नष्ट!

schedule08 Jul 26 person by visibility 453 categoryगुन्हे

कोल्हापूर  : महाराष्ट्र शासनाच्या 'नशामुक्त महाराष्ट्र' अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात एक महत्त्वपूर्ण व धडक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर तथा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून मिळालेल्या प्रेस नोटनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील १५ पोलीस ठाण्यांमधील ८९ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला गांजा, चरस आणि एमडी (MD) असा एकूण ५१५ किलो ४७२ ग्रॅम वजनाचा अज्ञातांचा/अमली पदार्थ न्यायालयाच्या आदेशानुसार आणि नाश समितीसमक्ष कायदेशीर प्रक्रिया पार पाडून नष्ट करण्यात आला आहे.

▪️कारवाईचा तपशील:
 * जप्त अमली पदार्थांचे प्रमाण: एकूण ५१५ किलो ४७२ ग्रॅम (गांजा, चरस, एमडी).
 * संबधित पोलीस ठाणी: लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, करवीर, शाहूपुरी, शिरोली एम.आय.डी.सी., गोकुळ शिरगाव, शाहूवाडी, शाहापूर, हुपरी, वडगाव, आजरा, गावभाग, गांधीनगर, शिवाजीनगर आणि इस्पुर्ली या १५ पोलीस ठाण्यांमधील ८९ गुन्हे.

 * नाश ठिकाण: हा नाश प्रक्रिया जैव वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प, कसबा बावडा, कोल्हापूर येथे पार पाडण्यात आली.

▪️नाश समिती व अधिकारी उपस्थिती:
सदर अमली पदार्थ नष्ट करण्याची ही प्रक्रिया पोलीस अधीक्षक  नीलोत्पल (भा.पो.से.) यांच्या अध्यक्षतेखाली व नियंत्रणाखाली पार पडली. या नाश समितीमध्ये अपर पोलीस अधीक्षक (गड विभाग कॅम्प इचलकरंजी)  अण्णासाहेब जाधव, राज्य उत्पादन शुल्काचे उपअधीक्षक/अति.कार्य.अधीक्षक  युवराज शेषराव शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण तसेच फॉरेन्सिक लॅब कोल्हापूरचे तज्ज्ञ, वजन मापे अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी आणि दोन शासकीय पंच उपस्थित होते. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार अशोक पोवार, अरविंद पाटील, युवराज पाटील, अमित सर्जे, राजु येडगे, निवती माळी, राजेश राठोड आणि संजय हुंबे आदी अधिकारी व अंमलदारांनी ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes