SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांची पूरग्रस्त भागांची पाहणी : यंत्रणेला सतर्कतेच्या सूचनाबाल संरक्षण व्यवस्थेचा सविस्तर आढावा सादर करावा : राज्य बाल हक्क संरक्षण आयोगकोल्हापुरात मुसळधार पावसाचा जोर कायम; ३३ बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पातळी ३० फुटांवरशिक्षण क्षेत्रातील नवीन आव्हानांचा शिक्षकांनी अवलंब करावा : मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहनभ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन: करवीर तालुका अध्यक्षपदी मन्सूर सय्यद यांची नियुक्तीकसबा सांगावच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करूडिग्री इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट शासनमान्य स्क्रुटनी केंद्रजेव्हा जगाने पाहिली पहिली टीव्ही बातमी: बीबीसीच्या क्रांतीचा एक प्रवासस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची १५ जुलै रोजी प्रवेश परीक्षाकोल्हापुरात पावसाचा जोर कायम: पंचगंगेची पाणी पातळी २५ फुटांवर; २० बंधारे पाण्याखाली

जाहिरात

 

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा जोर कायम; ३३ बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पातळी ३० फुटांवर

schedule05 Jul 26 person by visibility 174 categoryराज्य

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून जिल्ह्यात सरासरी ५२.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय पावसाचा विचार करता गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १४३.१ मि.मी. इतका विक्रमी पाऊस झाला आहे, तर भुदरगड (८५.९ मि.मी.) आणि राधानगरी (८१ मि.मी.) तालुक्यांतही मुसळधार पाऊस झाला आहे. 

सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून, आज दुपारी ४ वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी ३० फुटांवर पोहोचली आहे. तेथून सध्या ३०,३३६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पाणीपातळी सध्या इशारा पातळीपेक्षा (३९ फूट) खाली असल्याने नदीकाठच्या भागात कोणताही तातडीचा पूरधोका निर्माण झालेला नाही, मात्र जिल्ह्यातील एकूण २९९ पैकी ३३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २ राज्यमार्ग, २ प्रमुख जिल्हा मार्ग, २ ग्रामीण मार्ग आणि १ इतर जिल्हा मार्ग असे एकूण ७ रस्ते वाहतुकीसाठी बाधित झाले आहेत. मात्र, सुदैवाने रेल्वे वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. धरणांच्या पाणीसाठ्याचा विचार केल्यास, राधानगरी धरणात सध्या ३२ टक्के पाणीसाठा असून धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद आहेत. याशिवाय तुळशी धरणात ३८ टक्के, वारणा धरणात २४ टक्के आणि दूधगंगा धरणात ८ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून वारणा व दूधगंगा धरणातून प्रत्येकी १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोणत्याही कुटुंबाचे स्थलांतर करण्याची आवश्यकता भासलेली नसून जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महसूल व पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes