+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustबारावीच्या निकालाची तारीख जाहीर; विद्यार्थ्यांसह पालकांना उत्सुकता adjustपन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथे पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून adjustमुंबई उपनगरातील मतदान केंद्रे झाली सज्ज !; 74 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क adjustआमदार पी.एन. पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया adjustइराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या हेलिकॉप्टरचे हार्ड लँडिंग, राष्ट्राध्यक्षांशी संपर्क नाही adjustकोल्हापूर आंबा महोत्सव : कोल्हापूरकरांना अस्सल, नैसर्गिकरित्या पिकविलेला हापूस आंबा २३ मे पर्यंत मिळणार adjustआंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या ऐश्वर्याला उपविजेतेपद adjustसंपूर्ण कोल्हापूर जैन संघ आणि तरुणांची एकजूट पाहून माझे हृदय द्रवते : पं. राजरक्षित विजयजी adjustशिवाजी विद्यापीठच्या गुणवंत खेळाडूंचा गुण गौरव समारंभ “कलर अवार्ड “ वितरण उत्साहात adjustघुटना डावावर सुदर्शन कोतकर विजयी; शिरोली दु.।। येथे कुस्ती मैदान दोनशे मल्लाचा सहभाग
1000679152
SMP_news_Gokul_ghee
schedule09 May 24 person by visibility 222 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०ची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यात येत असून या धोरणाच्या अनुषंगाने येत्या शैक्षणिक वर्षापासून बारावीनंतर पदवी स्तरावरील अनेक अद्यावत आणि महत्त्वाचे नवे अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करण्यात येत आहेत. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांनी आपली उज्ज्वल कारकीर्द घडविण्याच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठातर्फे सन २०२४-२५ पासून बारावीनंतरचे अनेक पदवीस्तरीय अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्या अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी विद्यापीठाने आज दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे विशेष ‘स्कूल कनेक्ट अभियाना’चे आयोजन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाला इच्छुक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठामधील बारावीनंतरचे अभ्यासक्रम हे अन्य महाविद्यालयीन अभ्यासक्रमांपेक्षा वेगळे आहेत. पारंपरिक अभ्यासक्रमांना त्यांच्या रुपाने अत्यंत सक्षम पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अंतर्गत शिवाजी विद्यापीठ नवीन व अद्यावत अभ्यासक्रम सुरू करीत आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून बारावीनंतरचे बी.ए. स्पोर्ट्स, बी.ए. फिल्म मेकिंग, बी.कॉम. बँकिंग अँन्ड फायनान्स, बी.एस्सी.-एम.एस्सी. इकॉनॉमिक्स (पाच वर्षे एकात्मिक), बी.सी.ए., बी.एस्सी.-एम.एस्सी. (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग), बी.एस्सी.-बी.एड. (चार वर्षे एकात्मिक) आणि एम.बी.ए. (एकात्मिक चार वर्षे) हे अभ्यासक्रम सुरू करीत आहे. विद्यापीठाच्या ऑनलाईन व दूरस्थ शिक्षण केंद्रामार्फतही ऑनलाईन एम.बी.ए. सह इतरही अनेक महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांची माहिती विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, विद्यापीठाच्या हरित, प्रदूषणविरहित, पर्यावरणपूरक वातावरणात बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. त्यांना उच्चविद्याविभूषित शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यातील अनेक प्राध्यापक आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिकप्राप्त आहेत. थेट विद्यापीठात प्रवेश घेण्याचे अनेक लाभ विद्यार्थ्यांना मिळतात. दर्जेदार पायाभूत सुविधा, अत्याधुनिक संशोधन सुविधांनी सज्ज प्रयोगशाळा, डिजीटल क्लासरुम यांसह सर्वांगीण व्यक्तीमत्त्व विकासाच्या क्रीडा, कला सुविधा व स्पर्धासंधीही त्यांनी उपलब्ध होतात.

यावेळी डॉ. पी.जी. पाटील (बी.एस्सी.-एम.एस्सी.-नॅनोसायन्स व तंत्रज्ञान), डॉ. कबीर खराडे (बी.सी.ए. आणि बी.एस्सी.-एम.एस्सी. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग), डॉ. महेश साळुंखे (बी.टेक.), डॉ. विद्यानंद खंडागळे (बी.एस्सी.-बी.एड.), डॉ. ज्ञानदेव तळुले (बी.एस्सी.-एम.एस्सी. इकॉनॉमिक्स), डॉ. शिवाजी जाधव (बी.ए. फिल्म मेकिंग), डॉ. शरद बनसोडे (बी.ए.-स्पोर्ट्स), डॉ. आण्णासाहेब गुरव (बी.कॉम. बँकिंग अँड फायनान्स) व एम.बी.ए. (४ वर्षे एकात्मिक) आणि डॉ. सुशांत माने यांनी ऑनलाईन व दूरस्थ शिक्षण केंद्राच्या बी.ए. व बी.कॉम. अभ्यासक्रमांबाबत माहिती देऊन शंकासमाधान केले. 

कार्यक्रमात सुरवातीला मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० या अनुषंगाने उपस्थितांना अवगत केले. अभिजीत लिंग्रस यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.