SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पर्यावरण वाचले तरच माणूस वाचेल: डॉ. सुधीर कुंभार; कोते आदिवासी आश्रमशाळेत विद्यापीठाचा स्कूल कनेक्ट उपक्रमकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून ‘वंदे मातरम् सायक्लोथॉन २०२६’ चे आयोजनसेशेल्स प्रजासत्ताकचे महामहिम आणि प्रथम महिला यांचे दिल्लीकडे प्रयाणविमानतळाच्या विस्तारीकरणामुळे औद्योगिक विकासात नाशिक घेणार भरारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससमर्पणाच्या भावनेतून ‘अनुलोम’चे काम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसडी वाय पाटील प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटनकोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल: उद्या मतमोजणी; प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्जडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या १३ विद्यार्थ्यांची आयआयटी व एनआयटीमध्ये इंटर्नशिपसाठी निवडराजर्षी शाहू संगीत रजनी १० फेब्रुवारीपासूनदावोस कराराद्वारे अहिल्यानगरमध्ये १२ हजार कोटींची गुंतवणूक ; १८ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तौरल इंडियाच्या सुपा प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जाहिरात

 

पर्यावरण वाचले तरच माणूस वाचेल: डॉ. सुधीर कुंभार; कोते आदिवासी आश्रमशाळेत विद्यापीठाचा स्कूल कनेक्ट उपक्रम

schedule09 Feb 26 person by visibility 143 categoryसामाजिक

कोल्हापूर : पर्यावरण वाचले तरच माणूस वाचेल, म्हणून पर्यावरण समजून घेणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक डॉ. सुधीर कुंभार यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या वतीने कोते (ता. राधानगरी) येथील शासकीय आश्रमशाळेत आदिवासी आश्रमशाळा स्कूल कनेक्ट कार्यक्रमांतर्गत ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरण’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. केंद्राचे समन्वयक डॉ. श्रीकृष्ण महाजन अध्यक्षस्थानी होते.

डॉ. कुंभार म्हणाले, वणवा पेटवू नका. वणवा लागला तर तो कसा विझवायचा, हे शिकून घ्या. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा. सर्प शेतकऱ्याचा, आपला मित्र आहे. त्यांना मारु नका. झाडे लावून जगविली पाहिजेत. निसर्ग वाचवणे हे आपले कर्तव्य आहे. यावेळी सीड बॉल्स तसेच गांडूळ खत तयार करण्याची प्रक्रिया, जलसंवर्धनाची प्रक्रिया त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.

यावेळी अविनाश भाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक जगन्नाथ दराडे यांनी आभार मानले. यावेळी आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 कोल्हापूर, दि. ९ फेब्रुवारी: पर्यावरण वाचले तरच माणूस वाचेल, म्हणून पर्यावरण समजून घेणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक डॉ. सुधीर कुंभार यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या वतीने कोते (ता. राधानगरी) येथील शासकीय आश्रमशाळेत आदिवासी आश्रमशाळा स्कूल कनेक्ट कार्यक्रमांतर्गत ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरण’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. केंद्राचे समन्वयक डॉ. श्रीकृष्ण महाजन अध्यक्षस्थानी होते.

डॉ. कुंभार म्हणाले, वणवा पेटवू नका. वणवा लागला तर तो कसा विझवायचा, हे शिकून घ्या. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा. सर्प शेतकऱ्याचा, आपला मित्र आहे. त्यांना मारु नका. झाडे लावून जगविली पाहिजेत. निसर्ग वाचवणे हे आपले कर्तव्य आहे. यावेळी सीड बॉल्स तसेच गांडूळ खत तयार करण्याची प्रक्रिया, जलसंवर्धनाची प्रक्रिया त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.

यावेळी अविनाश भाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक जगन्नाथ दराडे यांनी आभार मानले. यावेळी आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes