नवी दिल्ली : तेलंगणात गेल्या चार दिवसांत पाऊस आणि संबंधित समस्यांमुळे 29 जणांचा मृत्यू झाला आहे, तर राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये पुराचा कहर आहे. सीएम रेवंत रेड्डी यांनी अशा सर्व जिल्ह्यांना तात्काळ प्रत्येकी 3 कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली आहे .जेणेकरून ते मदत आणि बचाव कार्य करू शकतील.
तेलंगणातील लोकांसाठी पाऊस ही मोठी समस्या बनली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, तेलंगणात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे 29 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्याच्या मुख्य सचिव शांती कुमारी यांनी सांगितले की, 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसात राज्यातील 33 पैकी 29 जिल्ह्यांना पूरग्रस्त घोषित करण्यात आले आहे.
मुख्य सचिवांनी सांगितले की, पूरग्रस्तांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान दिले जाईल आणि जिल्हाधिकाऱ्यांना 29 लोकांचे प्राण गमाविल्याचे तपशील पाठवण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी सोमवारी मदत आणि पुनर्वसन उपायांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेणार आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, पाऊस आणि पुरामुळे राज्य सरकारचे ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.