कोल्हापूर : टाकळीवाडी ता. शिरोळ येथील संग्राम शिवाजी खोत (वय ३०)यांचा चारा कुट्टी करत असताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला.
जनावरांच्या गोठ्यामध्ये सायंकाळी जनावरांना चारा घालण्यासाठी सुका चारा कुट्टी करण्यासाठी मशीन सुरू करण्यासाठी बटन दाबताच संग्राम यांना विजेचा जोरदार धक्का बसला.
त्यावेळी त्यांच्याकडून सुरू असलेली धडपड पाहून घरातील लोकांनी काठीने विद्युत प्रवाह बंद करून संग्राम यास तात्काळ नागरिकांनी दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले होते.
संग्राम खोत याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व अवघ्या तीन महिन्यांची एक लहानगी मुलगी आहे.