SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
दगड खाणीत उत्खनन करणारा हेलिकॉप्टर घेत असेल, तर शासनाला किती पैसे मिळाले पाहिजेत? आमदार सतेज पाटील यांची विचारणाजलजीवन मिशन योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी कोणती कारवाई केली? : आ. सतेज पाटील यांचा विधानपरिषदेत सवालजोपर्यंत निर्णय होत नाहीत तोपर्यंत आमचं ठरलंय, हलायचं नाही : आमदार सतेज पाटील; विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना पाठिंबामहाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी : अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणेकोल्हापूर महानगरपालिका : सर्व नागरी सुविधा केंद्रामध्ये जन्म-मृत्यु दाखले मिळणार जैवतंत्रज्ञान विभागात नवीन स्ट्रेनचा शोध पदव्युत्तर विद्यार्थ्याच्या संशोधनाला यश५० लाख कुटुंबांना लाभ : राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेची विधानसभेत घोषणामुंबई येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन संजय गायकवाड यांचे वर्तन अस्वीकार्य, कॅन्टीन कंत्राटदाराला मारहाण केल्याने मुख्यमंत्री फडणवीस संतापलेडी. वाय.पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या ४१ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

जाहिरात

 

जोपर्यंत निर्णय होत नाहीत तोपर्यंत आमचं ठरलंय, हलायचं नाही : आमदार सतेज पाटील; विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना पाठिंबा

schedule09 Jul 25 person by visibility 244 categoryराज्य

कोल्हापूर : अशंत:विनाअनुदानित शाळांना जोपर्यंत जोपर्यंत वाढीव टप्प्याचा निधी मिळत नाही तोपर्यत आमचं ठरलंय, हलायचं नाही, या शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात सुरु असलेल्या अशंत : विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. 

सतेज पाटील म्हणाले,  महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे ताकदीनेे या शिक्षकांबरोबर आहोत. विनाअनुदानित शाळांना वाढीव टप्प्याचा निधी देण्याचा अध्यादेश ऑक्टोबरमध्ये झाला. पण अद्याप हा निधी दिला गेला नाही. निवडणुकीच्या तोंडावर पाने पुसण्याचे काम या सगळ्या मंडळींनी केले. मार्चचे बजेट झाल्यानंतर याला चालना मिळेल, गती मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु   पन्नास हजार कोटींच्या पुरवण्या झाल्या. साडेनऊ लाख कोटी कर्ज झाले. मग विनाअनुदानित शाळांना वाढीव टप्पा देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करायला तुमचे हात का बांधले आहेत. असा सवाल आमदार पाटील यांनी केला. 

 महाराष्ट्रामध्ये ८६ हजार कोटींचा शक्तीपीठ गरज नसताना तुम्ही करता. मात्र, दुसऱ्या बाजूला आमच्या हक्काचे पैसे द्यायला मात्र सरकारची असते या शब्दांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. काँग्रेस पक्षाचा या आंदोलनाला पाठिंबा असून हा प्रश्न पुढे घेऊन जाण्याची भूमिका आम्ही घेऊ असा शब्द देत त्यांनी जोपर्यंत निर्णय होत नाहीत तोपर्यंत आमचं ठरलंय, हलायचं नाही. या शब्दांत आपली भूमिका जाहीर केली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes