SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्वच्छ कोल्हापूरसाठी महापालिका सरसावली; सुभाषनगर आणि वर्षानगर परिसरात राबवली धडक स्वच्छता मोहीम!वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापनवरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उद्ध्वस्त; शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, सिलिंडरचा साठा जप्त!धनगर आरक्षणासाठी महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजेव्हा भारतीय पडदा पहिल्यांदा बोलू लागला...विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा १५ मार्च रोजीअजितदादा पवार यांच्या पुतळा उभारणीसाठी जागा निश्चितीबाबत महापालिकेत आढावा बैठक​"दिल्ली दरबारी कोल्हापूरचा आवाज! कृष्णराज महाडिक यांनी घेतली भाजपच्या राष्ट्रीय दिग्गजांची भेट" कोल्हापूर: अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा उद्यापासून ४ दिवस दर्शनासाठी बंद!कोल्हापुरात २८ वर्षांची परंपरा असलेल्या ‘ईद फेस्टिवल’चे 17 मार्च रोजी उद्घाटन!

जाहिरात

 

स्वच्छ कोल्हापूरसाठी महापालिका सरसावली; सुभाषनगर आणि वर्षानगर परिसरात राबवली धडक स्वच्छता मोहीम!

schedule14 Mar 26 person by visibility 123 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर:  शहराला कचरामुक्त आणि सुंदर बनवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आज सुभाषनगर आणि वर्षानगर परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. माननीय महापौर सौ. रूपाराणी निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मोहिमेत लोकसहभाग आणि प्रशासकीय यंत्रणेचा समन्वय पाहायला मिळाला. सकाळी ७ वाजल्यापासूनच मोहिमेला उत्साहात सुरुवात झाली, ज्यामध्ये महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.


या मोहिमेदरम्यान परिसरातील मुख्य रस्ते, पदपथ (फूटपाथ), रस्त्यांच्या कडेला वाढलेले गवत (तनकट) आणि साचलेला प्लास्टिक कचरा पूर्णपणे साफ करण्यात आला. विशेष म्हणजे, या मोहिमेतून तब्बल २ ट्रॅक्टर आणि ३ डंपर इतका कचरा व प्लास्टिक गोळा करून तो विल्हेवाटीसाठी पाठवण्यात आला. व्हाईट आर्मीच्या २५ विद्यार्थ्यांनी या कार्यात मोलाची मदत केली, तर महापालिकेच्या आरोग्य विभागातील ५० कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसराचा कायापालट केला. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. कौसर बागवान, नगरसेवक अभिजीत मोकाशी, नगरसेविका  अरुणा गवळी यांच्यासह मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार व आरोग्य निरीक्षक अनिकेत सूर्यवंशी उपस्थित होते.


रहिवासी भागातील ही स्वच्छता केवळ प्रशासकीय उपक्रम न राहता ती एक लोकचळवळ व्हावी, असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला. नागरिकांनीही आपल्या परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन यावेळी महापौरांनी केले. आरोग्य विभागाच्या या धडक कारवाईमुळे सुभाषनगर आणि वर्षानगर परिसराने मोकळा श्वास घेतला असून, स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. महापालिकेची ही विशेष मोहीम आगामी काळात शहराच्या इतर भागांतही राबवली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes