SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘डिजिटल स्मार्ट रीडिंग झोनचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रारंभ नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागातील मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवासमावेशाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करणार - सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरमहानगरपालिकेच्या भाडेतत्त्वावरील डांबरी प्लॅंटमुळे गुणवत्ता वाढणार; डांबर खरेदी थेट हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) कंपनी कडूनकोल्हापूर शहरातील भटके कुत्रे शेल्टर उभारणीसाठी महानगरपालिकेची ८ डिसेंबरला महत्त्वपूर्ण बैठकपदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचा मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रमऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाला प्रारंभ; मुंबईच्या वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसडॉ. क्रांतीवीर मोरे यांची युवा वैज्ञानिक परिषदेसाठी निवडगोकुळमध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजराडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये “मिनी हॅकाथॉन २०२५” स्पर्धेत कृत्रिम बुद्धिमत्तेचे अनोखे प्रदर्शनकोल्हापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मोफत विधी सेवा सहाय्य विधीज्ञांची नियुक्ती

जाहिरात

 

गजापूर मधील भयभीत जीवनमान पूर्वपदावर आणणे आपले सर्वांचे व प्रशासनाचे प्राधान्य : पालकमंत्री हसन मुश्रीफ

schedule19 Jul 24 person by visibility 849 categoryविदेश

▪️पीडितांना लवकरात लवकर शासनाकडून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन

कोल्हापूर : विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलन करण्यासाठी आलेल्या आंदोलकांनी मौजे गजापूर मधील घरांचे व प्रार्थना स्थळाचे नुकसान केले होते. नुकसान झालेल्या भागातील पाहणी करून शासनाकडून दिलेल्या मदतीचा आढावा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला. यावेळी गावातील ग्रामस्थ, पीडित महिला पुरुष यांचेशी त्यांनी संवाद साधला व पडझड झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी गजापूर मधील भयभीत जीवनमान पूर्वपदावर आणणे आपले सर्वांचे व प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे सांगितले. दुर्दैवी घटनेनंतर गावातील नागरिक घाबरुन गेले आहेत, त्यांना धीर देणे त्यांना आवश्यक मदत देवून त्यांचे जीवनमान सुस्थितीत कसे येईल याचे नियोजन प्राधान्याने केले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी सोबत जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

पाहणी दरम्यान पालकमंत्री मुश्रीफ यांनी पीडितांना दिलासा देत शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे. कोणीही घाबरुन न जाता आपापल्या कुटुंबाला सावरा असा दिलासा दिला. गावात विशाळगड सारखी कायमस्वरूपी पोलिस चौकी उभारण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसेच मा. न्यायालयाकडून अतिक्रमण काढणे बाबत दिलेल्या आदेशांचा अभ्यास करुन २९ जुलैला होणाऱ्या पुढील सुनावणीदरम्यान प्रशासनाकडून प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

गावात तातडीची मदत म्हणून शासनाने 25-25 हजार रुपये असे एकूण 50 हजार रुपये प्रत्येकी मदत केलेली आहे. नुकसानीबाबत पंचनामे करून 2 कोटी 85 लाख रुपयांचा नुकसान भरपाई प्रस्ताव तयार केलेला आहे. ही मदत पीडितांना लवकरात लवकर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावात आल्यानंतर ही मदत तातडीने देणार असल्याचे जाहीर केले होते. 

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास आहे. इथे अशी दुर्देवी घटना घडायला नको होती असे मत व्यक्त केले. या घटनेची राज्यस्तरीय चौकशी होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सद्या भयभीत लोकांना दिलासा देवून त्यांचे जीवनमान सुरळीत सुरू करण्यासाठी शासन प्राधान्य देत असल्याचे ते पुढे म्हणाले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes