SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात फुटपाथवरील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई सुरुकोल्हापूर शहरातील भटके कुत्रे शेल्टर उभारणीसाठी महापालिकेच्या वि. स. खांडेकर शाळेत प्राणीप्रेमींची बैठक संपन्नकोल्हापूर प्राधिकरणाला 'विशेष नियोजन प्राधिकरण' दर्जासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर; ४२ गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार - पालकमंत्री प्रकाश आबिटकरविधिमंडळ हिवाळी अधिवेशन-2025 'दूरध्वनी पुस्तिके'चे माहिती विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते प्रकाशन, क्यू. आर. कोडमुळे डिजिटल पुस्तिका सहज उपलब्धसतेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात ११ कोटींची उलाढाल, तांदळासह शेती औजारे धान्याची उच्चांकी विक्रउज्ज्वल कोल्हापूर संघटनेच्या वतीने औद्योगिक कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात निवेदनबांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये नोकरीची संधीलक्ष्मीपुरी पोलीस लाईनच्या बांधकामामुळे ड्रेनेज लाईनची दुरवस्था नेहरू हायस्कूल परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता, विद्यार्थ्यांच्या आरोग्यास गंभीर धोकामाती व माणसाचे आरोग्य आधुनिक तंत्रज्ञानाने दर्जेदार करणे ही काळाची गरज : डॉ. चंद्रशेखर बिरादर; राष्ट्रीय स्तरावरील ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन’ स्पर्धेचे केआयटीत दिमाखदार उद्घाटनसंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलतर्फे “देशी झाडांचे वृक्षारोपण"

जाहिरात

 

गजापूर मधील भयभीत जीवनमान पूर्वपदावर आणणे आपले सर्वांचे व प्रशासनाचे प्राधान्य : पालकमंत्री हसन मुश्रीफ

schedule19 Jul 24 person by visibility 857 categoryविदेश

▪️पीडितांना लवकरात लवकर शासनाकडून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन

कोल्हापूर : विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलन करण्यासाठी आलेल्या आंदोलकांनी मौजे गजापूर मधील घरांचे व प्रार्थना स्थळाचे नुकसान केले होते. नुकसान झालेल्या भागातील पाहणी करून शासनाकडून दिलेल्या मदतीचा आढावा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला. यावेळी गावातील ग्रामस्थ, पीडित महिला पुरुष यांचेशी त्यांनी संवाद साधला व पडझड झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी गजापूर मधील भयभीत जीवनमान पूर्वपदावर आणणे आपले सर्वांचे व प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे सांगितले. दुर्दैवी घटनेनंतर गावातील नागरिक घाबरुन गेले आहेत, त्यांना धीर देणे त्यांना आवश्यक मदत देवून त्यांचे जीवनमान सुस्थितीत कसे येईल याचे नियोजन प्राधान्याने केले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी सोबत जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

पाहणी दरम्यान पालकमंत्री मुश्रीफ यांनी पीडितांना दिलासा देत शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे. कोणीही घाबरुन न जाता आपापल्या कुटुंबाला सावरा असा दिलासा दिला. गावात विशाळगड सारखी कायमस्वरूपी पोलिस चौकी उभारण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसेच मा. न्यायालयाकडून अतिक्रमण काढणे बाबत दिलेल्या आदेशांचा अभ्यास करुन २९ जुलैला होणाऱ्या पुढील सुनावणीदरम्यान प्रशासनाकडून प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

गावात तातडीची मदत म्हणून शासनाने 25-25 हजार रुपये असे एकूण 50 हजार रुपये प्रत्येकी मदत केलेली आहे. नुकसानीबाबत पंचनामे करून 2 कोटी 85 लाख रुपयांचा नुकसान भरपाई प्रस्ताव तयार केलेला आहे. ही मदत पीडितांना लवकरात लवकर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावात आल्यानंतर ही मदत तातडीने देणार असल्याचे जाहीर केले होते. 

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास आहे. इथे अशी दुर्देवी घटना घडायला नको होती असे मत व्यक्त केले. या घटनेची राज्यस्तरीय चौकशी होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सद्या भयभीत लोकांना दिलासा देवून त्यांचे जीवनमान सुरळीत सुरू करण्यासाठी शासन प्राधान्य देत असल्याचे ते पुढे म्हणाले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes