SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मातंग समाजाच्या कल्याणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘आर्टी’ संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे निर्देशगुजरात विमान दुर्घटनेतील मृतांप्रती मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून दुःख व्यक्तएअर इंडिया AI १७१ विमान अपघात : प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष कार्यान्वित"डेटा" हे नवसंशोधन व प्रगतीचे इंधन - श्रीनिवास पी. एम; डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘पॉवर बी. आय.’ कार्यशाळा उत्साहात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून विमान दुर्घटनेची गंभीर दखल; अहमदाबादच्या विमान दुर्घटनेतील मृत प्रवाशांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजलीअहमदाबाद विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यूआषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर बसपॅनकार्ड क्लब गुंतवणूकदारांचा पैसा परत करण्याबाबत कायदेशीर प्रकिया पूर्ण कराव्यातकोल्हापुरात वाहतूक शाखेतर्फे कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कारमॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्जासाठी ‘महाडिबीटी’वर अर्ज प्रक्रिया सुरु; नवीन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून

जाहिरात

 

कोल्हापूर शहरामध्ये 12524 नागरीकांची तपासणी

schedule11 Jun 25 person by visibility 283 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर :  शहर परिसरामध्ये किटकजन्य व जलजन्य दुषित पाण्याचे आजाराचे प्रमाण वाढत असल्याने महानगरपालिकेच्या साथरोग विभागामार्फत शहरामध्ये सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून प्रामुख्याने काविळ, डेंग्यू या आजाराचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. आज शहरामध्ये 12524 नागरीकांची विविध भागामध्ये तपासणी केली असता तपासणीत 10 तापाचे रुग्ण आढळून आले. त्याचबरोबर 42 नागरीकांचे रक्तजल नमुने तपासणीठी घेण्यात आले. या सर्व्हेमध्ये डेंग्यु डास अळी तपासलेल्या घरांची संख्या 2366 असून यामध्ये 25 घरांमध्ये डेंग्यु डास अळी आढळून आली. या घरांतील कंटेनरची तपासणी करुन त्यातील 24 कंटेनर रिकामी करण्यात आली. तर 6 कंटेनरमध्ये टॅमिफॉस हे औषध टाकण्यात आले.

 हे सर्व्हेक्षण प्रामुख्याने रविवार पेठ, मंगळवार पेठ, संभाजी नगर, जवाहर नगर, शिवाजी पेठ, टिंबर मार्केट, राजाराम चौक, महाकाली मंदिर, खंडोबा तालीम, राजारामपुरी यादव नगर, शाहू नगर, शाहुपुरी, मातंग वासाहत, बागल चौक, दौलत नगर, जागृती नगर , प्रतिभा नगर, सम्राट नगर, शास्त्री नगर, पांजरपोळ, तळवणे, महाडिक माळ, रुईकर कॉलनी, टाकाळा, टेंबलाईवाडी, विक्रम नगर, राजेंद्रनगर, नेहरूनगर, जवाहरनगर, सुभाषनगर, मोतीनगर, वर्षानगर, रामानंदनगर, जरगनगर, साळुखेनगर, खानभाग, एस.एस.सी. बोर्ड, नाना पाटील नगर, गंगाई लॉन, अंबाई टँक, हरी ओम नगर, बीडी कामगार वसाहत, लक्ष्यतिर्थ वसाहत, फुलेवाडी, बोंद्रेनगर, रिंगरोड, जाधववाडी, यशवंत नगर, माळ गल्ली, बापट कॅम्प, महालक्ष्मी नगर, बापट कॅम्प, ई वॉर्ड, गुरव माळ, जाधववाडी, पाटोळेवाडी, जीवबाना जाधव पार्क या भागामध्ये करण्यात आले. यावेळी आशा वर्कर्समार्फत या भागात जनजागृती करण्यात आली.  तसेच नागरीकांनी स्वच्छ साठलेले व साठविलेले पाणी आठवडयातून एकदा रिकामे करुन कोरडा दिवस पाळणे अत्यंत आवश्यक असत्याचे सांगण्यात आले. तसेच ताप आल्यास नजिकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले.

▪️डेंग्युची लक्षणे
डेंग्यु हा आजार एडीस इजिप्त या मादी डासाच्या चावण्यामुळे होतो.  हा डास दिवसा चावणारा असून या डासाची उत्पत्ती घरातील व परीसरातील भांडी, टाक्या व टाकाऊ वस्तु यात साठविलेल्या अथवा साठलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होतो. हा डास 3 ते 5 किलोमीटर भागामध्ये प्रवास करु शकतो. साधारणपणे या डासाच्या अळयांचे रुपांतर डासामध्ये 8 ते 10 दिवसात होते.

▪️उपाय
डासांचे जिवनचक्र खंडीत होणेकरीता (अळयांचे रुपांतर डासांमध्ये होणेसाठी) आठवडयातून एकदा कोरडा दिवस पाळणे आवश्यक आहे. त्याकरीता घरामधील स्वच्छ पाणीसाठे (फुलदाण्या, फ्रिज, कुलर) यामधील पाणी आठवडयातून एकदा रिकामे करावेत. डेंग्यु डास हा दिवसा चावणारा असून, रात्री विश्रांती घेतो. त्यामुळे दिवसा डास चावू नये याकरीता दक्षता घेणे आवश्यक आहे. डासाची संख्या कमी करण्यासाठी डासांच्या उत्पत्तीची स्थाने नष्ट करणे आवश्यक आहे. त्यासाठी एक दिवस कोरडा दिवस पाळणे आवश्यक आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes