SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देशकुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धाराचे काम धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलारकोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम; राधानगरीत धरणाचे सर्व सात दरवाजे उघडलेकोरे अभियांत्रिकी मध्ये “डिजिटल फाऊंड्री : कार्यशाळेचे उदघाटनदेशातील कर्तबगार स्त्रियांचा आदर्श विद्यार्थिनींनी घ्यावा : मंत्री चंद्रकांत पाटीलअतिवृष्टी, पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांचे निर्देशडी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे १४ विद्यार्थी; शिवाजी विद्यापीठाच्या 'टॉप टेन'मध्ये; अंतिम वर्ष अभियांत्रिकीची गुणवत्ता यादी जाहीरराज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश‘गोकुळ’च्या दूध उत्पादकांना नेहमीच सर्वाधिक दूध दर : आमदार सतेज पाटील; करवीर तालुका संपर्क सभा खेळीमेळीत राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट

जाहिरात

 

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

schedule18 Aug 25 person by visibility 72 categoryराज्य

कोल्हापूर : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता एस. जी. मुंगीलवार, कागल राधानगरी उपविभागाचे उप विभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

मंत्री  मुश्रीफ म्हणाले, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढत असून हवामान खात्याने 17 ते 21 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही सतत पाऊस पडत आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. राधानगरी व काळम्मावाडी धरणातून विसर्ग सुरु असून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना वेळेत सूचित करावे. अतिवृष्टी परिस्थितीत नदीकाठचे नागरिक, ग्रामस्थ यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सूचना वेळेत पोहोचवा, अशा सूचना देऊन दररोज पडणाऱ्या पावसाचे प्रमाण, धरणातून होणारा विसर्ग, नद्यांची पाणी पातळी, अलमट्टीतून होणारा सध्याचा विसर्ग आदी विषयांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. 

जिल्हाधिकारी अमोल येडगे व जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे यांनी अतिवृष्टीच्या अनुषंगाने प्रशासनाच्या तयारी बाबत माहिती दिली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes