SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
रखडलेल्या सातारा ते कागल महामार्गाच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनांकडून टोल वसुली करू नका : खासदार धनंजय महाडिकमाजी आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते 46 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभमाजी मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी कोरडे यांना नेहरू हायस्कूलमध्ये श्रद्धांजलीदक्षिण महाराष्ट्रात ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्ससाठी लोकप्रतिनिधींची बैठक घेणारदूध उत्पादकांचा दृढ विश्वास हीच ‘गोकुळ’ची खरी ताकद : डॉ.अभिनव गौरवमुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनीवरील घरे, चाळींचा झपाट्याने विकास होणारराज्यात आरोग्यसेवा अधिक सक्षम; आयुष्मान भारत–महात्मा फुले योजनेंतर्गत मोठ्या सुधारणा लागूलाडकी बहिण योजनेचे मानधन १५०० रुपया वरून २१०० रुपये करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली : सतेज पाटील यांचा विधिमंडळ अधिवेशनात सवाल कोल्हापुरी चपलांच्या जागतिक प्रसारासाठी प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करारमहाराष्ट्रात रोज सहा खून, २३ बलात्कार होत असताना गृहविभाग काय करतंय : सतेज पाटील यांचा सवाल

जाहिरात

 

रखडलेल्या सातारा ते कागल महामार्गाच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनांकडून टोल वसुली करू नका : खासदार धनंजय महाडिक

schedule12 Dec 25 person by visibility 191 categoryराज्य

▪️ केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
कोल्हापूर  : सातारा ते कागल या महामार्गाचे काम रखडले आहे. शिवाय महामार्गावरील खड्डे, ठिकठिकाणी निर्माण झालेली बाह्य वळणे, यामुळे पुणे ते कोल्हापूर महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे दिव्य बनले आहे. अशा परिस्थितीत आज नवी दिल्लीत केंद्रीय सडक आणि परिवहन मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी आढावा बैठक घेतली.

 सातारा ते कागल महामार्गाचे रखडलेले काम आणि दुरवस्था लक्षात घेता, संबंधीत कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे आणि महामार्ग सुस्थितीत येईपर्यंत वाहनधारकांकडून टोल वसुली करू नये, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली.

सातारा ते कागल महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम गेले दोन वर्षे सुरू आहे. पण अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. सातारा ते कागल महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. वारंवार येणार्‍या बाह्य वळणांमुळे प्रवासाला प्रचंड वेळ लागत आहे. पावसाळ्यात तर सातारा ते कागल महामार्गाची भीषण अवस्था झाली होती. या पार्श्‍वभूमीवर आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी बैठक घेतली. त्याला राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी आणि खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.

सातारा ते कागल महामार्गाचे काम प्रचंड रखडले असून, संबंधीत ठेकेदाराला ताबडतोब निलंबित करावे आणि नव्या सक्षम कंपनीकडे हे काम सोपवावे, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. तसेच जोपर्यंत महामार्गाचे काम दर्जेदार रित्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत वाहनधारकांकडून टोल घेवू नये, अशी मागणीही खासदार महाडिक यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान गेल्या सहा महिन्यात केवळ दोन टक्के काम केलेल्या संबंधीत ठेकेदारावर कारवाई सुरू केल्याचे नामदार गडकरी यांनी स्पष्ट केले. तसेच खासदार महाडिक यांनी केलेल्या मागणीबाबतही योग्य कार्यवाही करू, असे सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes