SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महिला व बाल कल्याणच्या योजनांसाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्जाचे आवाहनउच्चशिक्षणविषयक सर्वेक्षणात वस्तुनिष्ठ माहितीला महत्त्व: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के; विद्यापीठात अखिल भारतीय उच्चशिक्षण सर्वेक्षण प्रशिक्षण कार्यशाळा‘नशामुक्त कोल्हापूर’साठी प्रत्येक जिल्हावासीयाने सहभाग घ्यावा : जिल्हाधिकारी अमोल येडगेभागीरथी महिला संस्थेतर्फे खासदार महोत्सवांतर्गत आज रंगणार १० हजार महिलांची झिम्मा फुगडी स्पर्धा, ५ लाखांची बक्षिसे, विविध मालिकेतील कलाकारांची हजेरीहाजी अब्दुल मिर्शिकारी यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड – २०२५'राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथडॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच 100 टक्के प्रवेश : विश्वस्त ऋतुराज पाटील यांचे प्रतिपादन; गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मध्ये " इंजिनिअर्स डे " उत्साहात विद्यापीठात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा उत्साहातप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत अटकावून ठेवलेल्या वाहनांचा लिलाव

जाहिरात

 

कोल्हापुरात ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात स्वामी भक्तांचा महामोर्चा, निदर्शने; महाराव यांना तात्काळ अटक करण्याची मागणी

schedule20 Sep 24 person by visibility 1218 categoryसामाजिक

कोल्हापूर : ठाणें-मुंबई येथे संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन झाले. या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर टीका केली. या टीकेचा निषेध करत महाराव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत कोल्हापुरातील सर्व स्वामी समर्थ भक्ताकडूंन आज (शुक्रवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये हजारो स्वामी भक्त सहभागी होते. महिला स्वामी भक्तही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

ज्ञानेश महाराव यांनी संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्यावर टीका केली. त्याचबरोबर त्यांनी अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांच्या बद्दल देखील आक्षेपार्ह विधान केले. तसेच श्री संत गाडगे महाराज व संत श्री तुकाडोजी महाराज यांच्या कार्यावर सुध्दा आक्षेप घेतला. महाराव यांनी केलेल्या टीकेमुळं श्री स्वामी समर्थ भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरलाय. आज शुक्रवारी सकाळी ११.०० वाजता ऐतिहासिक दसरा चौकात सर्व. स्वामी भक्तांच्यावतीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला.

मोर्चामध्ये भजनी मंडळे, टाळ, मृदुंग, निषेधार्थ फलक, भगवे झेंडे, भगव्या टोप्या घालून भक्त मोठ्या संख्येने सामील झाले होते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा गजर करत भक्त उन्हाचा तडाखा असूनही शिस्तबद्ध पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात होते.

यावेळी भक्तांनी महाराव यांच्या विरोधात कोण म्हणते महाराव... हा तर एक महाभाग... कावळा करतो काव काव... चोपून काढा महाराव... जाहीर निषेध... जाहीर निषेध... विकृत प्रवृतीचा जाहीर निषेध. ह्या मुर्खाला अटक करा. मुर्खाचा महाराव, करोडो लोकांच्या आराध्य दैवतांचा अपमान सहन करणार नाही, असे फलक लोकांनी हातात घेतले होते.

व्हीनस कार्नर मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर काही वेळ स्वामींच्या घोषणा देत प्रमुख आयोजकांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना महाराव यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन दिले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक स्वामी भक्त सुहास पाटील, तर मोर्चाचे नियोजन धनंजय महिंद्रकर सांगितले. निवेदन वाचन कुलदीप जाधव यांनी केले. तर अरुण गवळी यांनी आभार मानले.

या मोर्चाचे आयोजन अरुण गवळी, कुलदीप जाधव, प्रथमेश माळी, सुहास पाटील, रमेश चावरे, धनंजय महिंद्रकर, अमोल कोरे, गुरुदेव स्वामी, अभिनंदन शिंदे, ॲड.भाग्यश्री पाटील आदी भक्तांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes