SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट; 'या' विषयावर सकारात्मक चर्चाआयआयसीटी फिल्‍म सिटीत जागा देणार, केंद्र सरकारकडून ४०० कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहितीस्वयंपूर्ण होण्यासाठी पुनर्वसन केंद्रातून मुला-मुलींना चांगल्या सेवा आणि शिक्षण द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगेसार्वजनिक वाचनालय, ग्रंथालयासाठी दर्जेदार दिवाळी अंक, कवितासंग्रह, कथासंग्रह भेट देणार : डॉ. सुनीलकुमार सरनाईकअंबाई टॅंकची दुरुस्ती करा : 'आप'चे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन उचगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात ‘टेक्नोवा’ सारख्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना : उद्योजक सारंग जाधव; डी. वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये आयोजन जिल्ह्यातील तीन लाख मुलींना एचपीव्ही लस देण्यासाठी नियोजन करा : मंत्री, हसन मुश्रीफहोळी : आनंद, सौख्य, उत्साहपूर्ण सणपालकांनी आपल्या पाल्याची आरोग्य तपासणी करुन घ्यावी : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख

जाहिरात

 

जीडीपी वाढीचा अमृतकाल : अतुल सुरी; बी आय डी एफ तर्फे गुंतवणुकीतील संधी विषयी व्याख्यान

schedule12 Feb 25 person by visibility 318 categoryशैक्षणिक

अतिग्रे: येणारा काळ हा जीडीपी वाढीसाठी महत्त्वाचा ठरेल कारण स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरचे राजकीय स्थैर्य आणि विकसित भारतासाठी सुरू असलेले प्रयत्न महत्त्वाचे आहे. यामुळे शेअर बाजारात तेजीची शक्यता राहणार असल्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी विचार करावा असे मत मॅरेथॉन ट्रेंड्स ॲडव्हायझरीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अतुल सुरी यांनी केले. संजय घोडावत विद्यापीठात बी आय डी एफ तर्फे  अमृत काल - गुंतवणुकीतील संधी विषयी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

 सुरी  म्हणाले, 2047 पर्यंत निफ्टीचा विचार केल्यास उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार यांना यामध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. भारतातील वाढत्या बाजारपेठेचा विचार केल्यास मेहनतीने आणि विचारपूर्वक गुंतवणूक करणे गरजेचे आहे. आर्थिक विकासाचा दर हा 15 किंवा 20 वर्षांनी वाढत असतो. खऱ्या अर्थाने गुंतवणुकीसाठी हा काळ अमृत काळ असतो. जागतिक बाजारपेठेचा अभ्यास केल्यास अशीच परिस्थिती दिसून येते. जीडीपी वाढ आणि स्टॉक मार्केट वाढ यांच्यामध्ये सहसंबंध असतो. ज्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे,  त्या देशाचा विकासदर वाढताना दिसतो. अशा परिस्थितीत सेविंग चे प्रमाण वाढलेले असल्यामुळे गुंतवणूक करणे फायद्याचे असते असे मत त्यांनी मांडले.

पुढे ते असेही म्हणाले की भारतात परदेशी गुंतवणूकदार जसे गुंतवणूक करतायेत तशाच पद्धतीने भारतातील गुंतवणूकदारांनी या गुंतवणुकीचा अभ्यास करून विविध क्षेत्रात गुंतवणुकीचे प्रमाण वाढवायला हवे. येणारी 28 वर्षे ही भारतीय बाजारपेठेत गुंतवणूकीसाठी चांगली असणार आहेत. अमेरिका चीन या देशांचा विचार करता भारत हा तरुणांचा देश बनला आहे, त्यामुळे उत्पादनक्षमतेत सातत्य राहणार असून हा काळ अमृत काळ सर्वांसाठी असणार आहे.

 यावेळी बी आय डी एफचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी फोरम द्वारे उद्योग व्यवसाय वाढीसाठी सातत्याने नवीन उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले. गुंतवणुकीमुळे आपण यशाची एक एक शिखरे पार करत पुढे जातो त्यासाठी गुंतवणुक वाढवणे गरजेचे आहे. पैसे वाढवताना मूल्यांची जपणूक करणे गरजेचे असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहन  तिवडे यांनी केले तर आभार व्यावसायिक राजू मेहता मानले यावेळी बी आय डी एफ चे सदस्य उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes