SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रख्यात वास्तुशिल्पकार, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भिर्डी यांचे निधनपशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस"भीमा कृषी प्रदर्शनाच्या शनिवारच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांसह नागरिकांची ,शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तुफान गर्दीगारगोटीत 'जिल्हा ग्रंथोत्सव २०२५' चा दिमाखात शुभारंभ; ग्रंथदिंडीने वेधले लक्षकृषी प्रदर्शन-कराओके गायन स्पर्धा : आदिती भराडे, वसिम मुजावर यांनी पटकावला प्रथम क्रमांकअतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांची घोडावत विद्यापीठाला सदिच्छा भेटभिमा कृषी प्रदर्शनात भागीरथी महिला संस्थेच्यावतीने मोफत झुणका-भाकरी वाटपमहाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा सोमवारी सत्कारदक्षिण-पश्चिम विभागीय युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठ संघाचे घवघवीत यशभाजपच्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांचा उद्या रविवारी सत्कार

जाहिरात

 

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे..

schedule15 May 24 person by visibility 917 categoryसामाजिक

▪️१५ मे :राष्ट्रीय वृक्ष दिनाच्या निमित्ताने..

जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणजे भागवत सांप्रदायाच्या मंदिराचा कळस. संत तुकाराम हे संवेदनशील भावकवी होते. त्यांच्या रचना म्हणजे उत्कट अनुभूतीचा साक्षात्कार आहे.ते जसे जगले तसे ते त्यांच्या वाणीतून व्यक्त होत होते.त्यांच्या मनातील भावना आपोआप पोटातून ओठांवर आल्या. संसारात राहून परमार्थ साधता येतो असे सांगणाऱ्या या कृतिशील महान साक्षात्कारी संताने वृक्षाचे महत्त्व अत्यंत आत्मियतेने व तळमळीने सांगितले आहे, ते म्हणतात..

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे/ पक्षीही सुस्वरे आळविती /येणे सुखे रुचे एकांताचा वास/ नाही गुणदोष अंगा येत//
    वृक्षवल्ली, वनचरे तसेच सुस्वर कंठाने आळविणारे पक्षी हे आमचे सगे - सोयरे, गण -गोत आहेत. त्यांच्या सोबत एकांतात रहात असताना माणूस प्रसन्न, निर्भय व निष्कलंक होतो. कारण वृक्ष,लता, वेली त्यांच्या समवेत असणारे असंख्य पक्षी, यांच्या सहवासात रहात असताना अंगी कोणतेही गुणदोष लागत नाहीत. आकाशाचा मंडप आणि पृथ्वीचे आसन असणाऱ्या मुक्त वातावरणात प्रत्येक मनुष्याला आनंद, आणि प्रसन्नता लाभते, त्यांच मन रमून जात.
तुका म्हणे होय मनासि संवाद/
आपुलाची वाद आपणासि//
अर्थात वृक्षाच्या सानिध्यात राहून त्याचे गुण आपल्या अंगी बाणायला लागतात. आपण उन्हात तळपत राहून वृक्ष पांथस्थांना सावली देतात, सृष्टीतील पर्यावरणाचे रक्षण करतात, मानवाला औषधी गुणधर्माची फळे,पाने,फुले, देतात, घरादाराला लाकूड पुरवतात, जळणासाठी तसेच डिंक, कागद निर्मितीसाठी सहाय्यभूत होतात.अर्थात आपलं सर्वस्व समर्पित करून संसार तापाने तापलेल्या जीवाला सुखाची, समाधानाची,व आरोग्यदायी सावली देणारा वृक्ष हा खरोखरच सत्पुरुष आहे, असे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ते आजच्या काळातही तंतोतंत लागू पडते.

आज जगभरात आधुनिकीकरण व विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे, त्याचे दुष्परिणाम अत्यंत भयानक व भयावह असून मानवी जीवनात अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. ग्लोबल वाॅर्मिंग सारखी समस्या जगाच्या अर्थात मानवाच्या अस्तित्वावरच घाला घालते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वृक्षाचे महत्त्व चारशे वर्षांपूर्वी सांगितले आहे, यांत त्यांचा दूरदृष्टीपणा व मानवी जीवनाविषयीचा कळवळा दिसून येतो, संतोक्तीप्रमाणे जास्तीत जास्त वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकांनी कंबर कसली पाहिजे...!!.

✍️ डाॅ. सुनीलकुमार सरनाईक.

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes