+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule23 Jul 24 person by visibility 231 categoryसामाजिक
कोल्हापूर : यशस्वी उद्योग निर्मितीसाठी पारंपारिक ज्ञान व कौशल्याबरोबरच नाविन्यपूर्ण कल्पनांची आवश्यकता आहे. तरुणांनी नोकऱ्यांच्या पाठीमागे न धावता उद्योजिकतेची कास धरली पाहिजे. त्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य संपादित केले पाहिजे असे प्रतिपादन मनीषा तपस्वी यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र व देअसरा फौंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्रथम पिढी उद्योजकता विकास कार्यक्रम’ उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. श्रीकृष्ण महाजन अध्यक्षस्थानी होते. 
उद्योजिकतेचा कोणताही कौटुंबिक वारसा अथवा पार्श्वभूमी नसलेले विद्यार्थी आणि दिव्यांग व तृतीय पंथी, वंचित घटकातील व्यक्ती यांच्यामध्ये उद्योजिकतेची प्रेरणा निर्माण करणे आणि त्यातून त्यांनी उद्योजक बनावे या उद्देशाने शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र व देअसरा फौंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रथम पिढी उद्योजकता विकास कार्यक्रम’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

 तपस्वी म्हणाल्या, देशात आज ४० टक्के लोकांकडे नोकऱ्या अथवा रोजगार नाही त्यामुळे तरुणांनी उद्योजकतेकडे वळले पाहिजे. आजच्या यशस्वी उद्योजकांच्या यशामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच सामाजिक माध्यमे महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत. दृढता, जोखीम, नेटवर्किंग, सृजनशीलता व सहानुभूती या तत्त्वांचा अंगिकार केल्यास उद्योग वा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो.  

या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात विद्यापीठ अधिविभाग, देशभक्त रत्नाप्पा कुंभार महाविद्यालय, राजर्षी शाहू महाविद्यालय, छत्रपती शहाजी महाविद्यालय, न्यू कॉलेज, कोल्हापूर, शिवराज कला व वाणिज्य आणि घाळी कॉलेज, गडहिंग्लज, राजर्षी शाहू महविद्यालय, रुकडी, हेल्पर्स ऑफ हैन्डीकॅप व मैयत्री संघटना, कोल्हापूर यांचा समावेश आहे.

 अध्यक्षीय समारोप करताना प्रा. डॉ. श्रीकृष्ण  महाजन म्हणाले, ‘ यशस्वी उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांच्या अंगी उद्यमशीलता आवश्यक आहे. काही उद्योगांमध्ये फक्त भांडवल नव्हे तर संकल्पनांची आवश्यकता असते. एखादी शासकीय योजना आहे म्हणून व्यवसाय करू नका. कोणताही उद्योग किंवा व्यवसाय सुरु करताना किमान ५० टक्के स्वभांडवलाची आवश्यकता असावी. 

प्रा. अविनाश भाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आभार डॉ. किशोर खिलारे यांनी मानले. यावेळी डॉ. नितीन माळी, डॉ, अमोल मिणचेकर, डॉ. परशुराम वडर डॉ. निलम खामकर व चारुशीला तासगावे यांच्याबरोबर विविध अधिविभागातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.