+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule26 Jul 24 person by visibility 252 categoryराज्य
 मुंबई : मुंबईच्या विकासात ‘बेस्ट’चे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी ‘बेस्ट’ ला बळकट करणे आवश्यक असून यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बेस्ट’ प्रशासनाला केली. यासाठी शासनामार्फत सर्व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

  ‘बेस्ट’ उपक्रमातील कर्मचाऱ्यांना उपदान (ग्रॅच्युइटी), कोविड भत्ता, कायमस्वरुपी तसेच हंगामी स्वरुपातील कामगारांना नेमणूक पत्र आदींच्या माध्यमातून न्याय दिल्याबद्दल श्रमिक उत्कर्ष सभेच्या वतीने ‘धन्यवाद देवेंद्रजी’ या कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह आमदार ॲड. आशिष शेलार, प्रवीण दरेकर, श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष प्रसाद लाड, ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर आदी उपस्थित होते.

   उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते यावेळी ‘बेस्ट’ कामगारांच्या उपदानासाठीचा (ग्रॅच्युइटी) 332 कोटींचा तसेच कोविड भत्त्यापोटीचा 78 कोटींचा धनादेश प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला. त्याचप्रमाणे कायमस्वरुपी कामगार आणि हंगामी स्वरुपातील कामगारांना नेमणूक पत्र, धाडसी कार्य करणाऱ्या कामगारांचा सत्कार, पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना पत्र देऊन प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

    यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईने 1873 मधील ट्राम सेवेपासून आजच्या ‘बेस्ट’ बस पर्यंत सार्वजनिक वाहतुकीचे परिवर्तन पाहिले आहे. मुंबईकरांना त्यांच्या गंतव्यस्थानाच्या जवळ पोहोचण्यासाठी एकाहून अधिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आवश्यक असल्याने आता मेट्रोचे जाळे देखील विणले जात आहे. तथापि, ‘बेस्ट’ सेवेचे महत्त्व अबाधित असून तिला अधिक बळकट केले जाईल, असे त्यांनी सांगितले. ‘बेस्ट’ कामगारांच्या जुन्या झालेल्या निवासी संकुलांच्या पुनर्विकासाबाबत तसेच ‘बेस्ट’च्या बळकटीकरणाला मदत होईल, अशा पद्धतीने बस डेपोच्या पुनर्विकासाबाबत देखील आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

  प्रारंभी श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष आमदार श्री. लाड यांनी प्रास्ताविकात बेस्ट च्या कामगारांच्या विविध मागण्या पूर्ण झाल्याबद्दल शासनाचे आभार मानले. आमदार सर्वश्री श्री. शेलार, श्री. दरेकर यांनी देखील ‘बेस्ट’च्या कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले. महाव्यवस्थापक श्री. डिग्गीकर यांनी आभार प्रदर्शन केले.