कोल्हापूर : जिल्हयात मंगळवार, दिनांक 25 जून 2024 पासून पावसाचे प्रमाण वाढले असून धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे.
त्यामुळे नदी पात्रातील पाण्याची गढूळता वाढलेली आहे. या पाण्यावर महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आवश्यकत्या प्रमाणामध्ये क्लोरीन, लमचे डोस देऊन पाणी शुध्दीकरण करण्यात येत आहे.
तरीही खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील नागरीकांनी नळाला आलेले पाणी उकळून व गाळून घेऊन पिण्यासाठी वापरावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.