+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule23 Jun 24 person by visibility 299 categoryराजकीय
कोल्हापूर : देशाच्या प्रधानमंत्री पदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी विराजमान झालेले आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान नरेंद्र मोदी यांनीच मिळवलेला असून समाजाच्या विकासासाठी हे सरकार निश्चितपणाने कटिबद्ध राहील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात आज 
बूथ रचना कार्य योजना अभियानाच्या बैठकीमध्ये ते बोलत होते .

  याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, समन्वयक राहुल चिकोडे, माजी मंत्री भरमु सुबराव पाटील हे प्रमुख उपस्थित होती.

यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांनी भविष्यकाळात बूथ मजबूत केल्यास विधानसभा निवडणुकीला यश मिळवणे सोपे जाईल त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या विश्लेषणात फार काळ गुंतून न राहता आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे .

यावेळी भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनचा ठराव मांडला त्यास ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई व महिला जिल्हाध्यक्ष रूपाराणी निकम यांनी अनुमोदन दिले .

यावेळी माजी मंत्री भरमु सुबराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मेजर भिकाजी जाधव, के एन पाटील, हंबीरराव पाटील, हेमंत कोलेकर, संग्रामसिंह कुपेकर, संभाजी आरडे, राधानगरी अध्यक्ष विलास रणदिवे, भुदरगड अध्यक्ष अनिल तळकर, करवीर अध्यक्ष दत्तात्रय मेडशिंगे, पन्हाळा अध्यक्ष मंदार परितकर, गगनबावडा अध्यक्ष स्वप्निल शिंदे, आजरा अध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, अप्पा लाड, राजू मोरे, शैलेश पाटील, गणेश देसाई, उमा इंगळे, किरण नकाते, विजय खाडे, भरत काळे, रोहित पोवार, अमर साठे, राजसिंह शेळके, संगीता खाडे, मंगला निपाणीकर, शीतल तिरुके, प्रदीप उलपे, विशाल शिराळकर, अभिजित शिंदे, सतीश घरपणकर, संतोष माळी, संदीप कुंभार, आजम जमादार, चंद्रकांत घाटगे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 प्रारंभी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या *स्मृतीदिनानिमित्य* त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यांनातर एक पेड माँ के नाम कार्यक्रमाअंतर्गत कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

स्वागत महानगर सरचिटणीस डॉ. राजवर्धन यांनी केले आभार जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील यांनी मानले.