+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule08 Oct 24 person by visibility 262 categoryदेश
नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सलग तिसरा विजय संपादित करत विजयाची हॅट्रिक केली. विधानसभेच्या ९० जागांपैकी भाजपने ४८ जागा मिळवून बहुमत संपादित केले. तर जम्मू-काश्मिरातून कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने बाजी मारली आहे.

नॅशनल कॉन्फरन्सने तब्बल ४२ जागाआणि काँग्रेसने ७ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडचे सरकार सत्तेत येणार आहे.

 काश्मिरमधील विजयानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला हे राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी केली. शेतकरी आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे हरियाणात भाजपविरोधात वातावरण असतानाही भाजपने हरियाणात घवघवीत यश मिळवले. 

हरियाणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी विजयादशमीच्या दिवशी १२ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. नायबसिंग सैनी यांच्यावर जनतेने विश्वास व्यक्त केल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. यावेळी भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाली. 

काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडचे सरकार सत्तेत येणार आहे. राज्यात काँग्रेस सत्ता स्थापन करणार असली तरी गेल्या वेळच्या तुलनेत यंदा काँग्रेसच्या सुमारे ५० टक्के जागा घटल्या आहेत. तर गेल्यावेळी भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीचा सुपडासाफ झाला. भाजपला ४ जागांचा फायदा झाला. पण भाजपने जिंकलेल्या सगळ्या जागा या जम्मूमधल्या आहेत. काश्मीर खोऱ्यात भाजपला एकही जागा जिंकता आलेली नाही.

 जम्मू-काश्मिरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) आणि काँग्रेस आघाडीने ९० पैकी ४९ जागापटकावल्या आहेत. राज्यात बहुमतासाठी ४६ जागांची गरज असताना एनसी-काँग्रेस आघाडीने ३ अतिरिक्त जागा संपादित केल्या आहेत. तर भाजपला राज्यात २९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तसेच पीडीपीला ३ आणि इतरांचा ९ जागांवर विजय झाला आहे.