+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule20 Sep 24 person by visibility 222 categoryदेश
कोल्हापूर : राज्यातील महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने राज्यातील निवडक 1 हजार महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांचा तसेच विविध उपक्रमांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे प्रारंभ करण्यात आला. कौशल्य विकास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने झालेल्या या ऑनलाईन कार्यक्रमात जिल्ह्यातील 40 महाविद्यालयांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला.

 स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील केंद्राच्या प्रारंभ कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, या संस्थेचे डॉ.बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे संचालक विरेन भिर्डी, प्राचार्य डॉ. सुहास सपाटे, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक रजनी मोटे आदी उपस्थित होते.

 कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या उद्देशाने राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करुन महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातील 1 हजार निवडक महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांमधून मोफत कौशल्य विकास कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.