+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule04 May 24 person by visibility 326 categoryराजकीय
मुंबई : "मोदींची कौटुंबिक परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. त्यांच्याबद्दल मला माहित आहे. त्यांनी तरी स्वतःचे कुटुंब कुठे सांभाळले," असा पलटवार राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ज्यांना कुटुंब सांभाळता आले नाही ते महाराष्ट्र काय सांभाळणार, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली होती. त्यांच्या या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले की, "असं व्यक्तिगत बोलू नये. हे पथ्य पंतप्रधानांनी पाळले नाही. मी हे पथ्य पाळू नये ही माझी भूमिका योग्य राहणार नाही. मला त्यांच्याबद्दल माहित आहे, पण मी त्या स्तरावर जाणार नाही. त्यांची कौटुंबिक परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. त्यांनी स्वतःचे कुटुंब कुठे सांभाळल?" असा सवाल पवार यांनी केला.

एका खासगी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्या विषयी टीका केली होती ते म्हणाले होते की "त्यांची समस्या ही राजकीय नाही. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला हे कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी लोकांना ते कसे पटणार? त्यांची ही कौटुंबिक समस्या आहे. हा पूर्णपणे घरातील वाद आहे. काम करणाऱ्या पुतण्याला वारसा द्यायचा की मुलीला? त्यामुळे सहानुभूतीऐवजी असा प्रश्न पडतो की जे या वयात कुटुंबाला संभाळू शकले नाहीत ते महाराष्ट्राला काय संभाळणार?" अशी टीका मोदींनी केली होती.

पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी जनतेला अनेक अश्वासने दिली होती. पण त्यांनी ती पूर्ण केली नाहीत. त्यांचा स्वभाव फक्त बेछुटपणाने बोलायचा आहे. सरकारची आजची परिस्थिती काय आहे, याचा विचार ते करत नाहीत. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांच्याबद्दलची आस्था कमी होत आहे. मोदींनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या धोरणांवर अनेकवेळा टीका केली. पण आज मनमोहन सिंग यांचेच सर्व निर्णय मोदी राबवतात. काँग्रेसला या निवडणुकीत दहा-बारा आणि राष्ट्रवादीला आठ-नऊ जागा मिळतील, असा दावा देखील पवार यांनी केला आहे.