SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्यात 15 ऑक्टोबर पासून वादळी पावसाचा अंदाजयोजनांचा लाभ न देणाऱ्या हॉस्पिटलची तक्रार द्या, कारवाई करतो : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरडॉ. आंबेडकरांच्या पुतळा आगमन सोहळ्याबद्दल बौध्द समाजातर्फे आमदार यड्रावकरांचा सत्कारसतरा आक्टोबरला “एक सांज पन्हाळगडावर” भागीरथी महिला संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन यांच्यातर्फे पाडळी खुर्द येथील विद्या मंदिरमध्ये आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळाऊर्जा, इच्छाशक्ती आणि जोखीम घेण्याची तयारीच आपल्याला जीवनात यशस्वी करते : संकर्षण कऱ्हाडेरंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच : आमदार राजेश क्षीरसागरडॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम; राज्यातील प्रत्येक शासकीय शाळेत पोहचणार जागतिक दर्जाचे शिक्षणकोल्हापूरात २८ ऑक्टोबरला जिल्हास्तर युवा महोत्सव; युवक-युवतींना सहभागाचे आवाहन८.१२ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड

जाहिरात

 

राज्यात 15 ऑक्टोबर पासून वादळी पावसाचा अंदाज

schedule12 Oct 25 person by visibility 125 categoryराज्य

▪️शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे
 
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. मात्र 15 ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित आहे. या तारखेपासून किमान 18 ऑक्टोबर पर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपार नंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे.

सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकतं, जिथे या दरम्यान अनेक भागांमध्ये आभाळी हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील. तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो.

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes