+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule18 Jul 24 person by visibility 565 categoryसामाजिक
कोल्हापूर : करवीर नगरीत सामाजिक सलोखा बिघडविण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी आम्ही ते प्रयत्न अधिक ताकदीने हाणून पाडू, असा संदेश देत कोल्हापुरातील सर्वधर्मिय हजारोच्या संख्येने सहभागी होत आज, गुरुवारी कोल्हापूर शहरातून शिव-शाहू सद्भावना यात्रा काढली. यातून ऐक्याचे दर्शन घडले.

विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याच्या मागणीवरुन झालेल्या आंदोलनाने उद्भवलेल्या हिंसाचारात विशिष्ठ समाजाला टार्गेट करण्यात आले त्याचा तीव्र निषेध करण्याकरिता कोल्हापुरातील इंडिया आघाडीचे नेते तसेच समस्त पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी या सद्भावना यात्रेचे आयोजन केले होते. या सद्भावना यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला.

नर्सरी बागेतील राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारक येथे गुरुवारी दुपारी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका व्यक्त करत वरील घटनेचा निषेध केला तसेच शासनाने दोषीवर कारवाई करावी. व नुकसानग्रस्तांना अधिक मोबदला मिळवून द्यावा अशी भूमिका मांडली. तसेच सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी इंडिया आघाडी प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली. यानंतर पाच वाजता सद्भावना यात्रा सुरू होऊन चिमासाहेब महाराज चौक, सीपीआर चौक, भाऊसिंगची रोड, महापालिकामार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचली. तेथे या सद्भावना यात्रेची सांगता झाली. ही यात्रा मुक होती, त्यामुळे कसल्याही प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या नाहीत. यात्रेत तिरंगा ध्वज, संविधानाची प्रत, राष्ट्रपुरुषांचे फलक पहायला मिळाले.

सर्वधर्मिय समुदाय सद्भावना यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. या यात्रेचे नेतृत्व खासदार शाहू छत्रपती, विधान परिषदेतील कॉग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्यासह पुरोगामी कार्यकर्त्यांनी केले.