SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘आय.आय.एस.सी.’समवेत संशोधनासाठी निवड झालेल्या संशोधकांचा विद्यापीठात गौरवइचलकरंजी शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा क्वॉलिटी कॉन्सिल ऑफ इंडिया संस्थेकडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे मूल्यमापनमुंबईतील जैन मंदिर पुन्हा उभारा, जैन समाजाचा कोल्हापुरात आक्रोश मोर्चावक्फ कायद्यात झालेली दुरुस्ती म्हणजे केंद्र सरकारचा क्रांतिकारक, ऐतिहासिक निर्णय : खासदार धनंजय महाडिकसंजयबाबा घाटगेंनी स्वीकारले भाजपाचे प्राथमिक व सक्रिय सदस्यत्व; कार्यकर्त्यांसमवेत जिल्हा कार्यालयाला दिली भेटमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजलीमनरेगा अंतर्गत भूजल पातळी वाढीसाठी ५० हजार ‘जलतारा’ (शोषखड्डे) निर्माण करून आदर्श मॉडेल तयार करा : जिल्हाधिकारी अमोल येडगेपहलगाम दहशतवादी हल्ला: सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा, दहशतवादाविरुद्ध देश एकजूट

जाहिरात

 

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

schedule25 Apr 25 person by visibility 138 categoryराज्य

▪️232 पर्यटक घेऊन तिसरे विमान पोहोचले, आतापर्यंत 800 पर्यटक राज्यामध्ये परत

मुंबई : महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन मुंबईत दाखल झाले. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 800 पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, महाराष्ट्रात प्रत्येक पोलिस स्थानकाला त्याची सूचना दिली जात आहे. कोणताही पाकिस्तानी नागरिक 48 तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असून, जो कुणी अधिक काळ वास्तव्य करताना आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसारच ही कारवाई होईल.

दरम्यान, काल दोन विशेष विमानांनी 184 प्रवासी महाराष्ट्रात परतल्यानंतर तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन महाराष्ट्रात पोहोचले. ही तीन विमाने मिळून महाराष्ट्रातील 416 पर्यटक परत आले, तर अन्य माध्यमातून आतापर्यंत सुमारे 800 प्रवासी परत आले आहेत. याशिवाय, सुमारे 60 ते 70 आणखी पर्यटकांच्या विनंती प्राप्त झाल्या असून, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करून देण्यात येत आहे. जसजशा विनंती प्राप्त होतील, तसे त्या पर्यटकांना परत आणण्याची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes