SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
५ व ६ मार्च रोजी पन्हाळा, गगनबावडा व आजरा आयटीआय येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन‘गोकुळ’ च्या दूध उत्पादकांसाठी ‘हवामान निकषांधारित जनावरांची विमा योजना’ : चेअरमन नविद मुश्रीफसंभाजीनगर बस स्थानक च्या नूतन नामफलकावर कोल्हापूर नावाचा समावेश करावा; शहरभान'ची मागणीसावधान! कोल्हापुरात १६ मार्चपासून 'हेल्मेट' सक्ती; विना हेल्मेट टोल नाक्यावर 'नो एन्ट्री'जनगणनेचे काम अचूक असावे : जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षितभाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक पक्षीय कामात सक्रिय, जिल्हास्तरीय युवा आघाडीची बैठक घेवून केली कामांची आखणीशासकीय वसतिगृह व स्वयंम योजनांचे प्रवेश वेळापत्रक जाहीरकोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई: 'सान्वीक वेल्थ'चा मुख्य सूत्रधार ४ वर्षांनंतर गजाआड!तोंडातील बुरशीजन्य संसर्ग रोखणारे जेल विकसित; डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचे यशसमाजकार्याचा प्रत्येक विद्यार्थी शाश्वत विकासाचे बीज: सिद्धार्थ शिंदे

जाहिरात

 

जनगणनेचे काम अचूक असावे : जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षित

schedule04 Mar 26 person by visibility 77 categoryराज्य

कोल्हापूर :  केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना सामान्य लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने लवकरच जनगणनेचा कार्यक्रम दोन टप्प्यांमध्ये घेण्यात येत आहे.या जनगणनेच्या कामासाठी संबंधित अधिकारी-कर्मचारी यांनी हे काम निर्धारित वेळेत व अचूकरित्या पूर्ण करण्यासाठी दक्ष असावे,असे आवाहन जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षित यांनी केले .

 जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात जनगणना संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने चार ते सहा मार्च या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांचे तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे  .या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव,इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी नंदू परळकर ,कोल्हापूर मनपाचे उपायुक्त तथा जनगणना अधिकारी परितोष कंकाळ,कोल्हापूर जिल्हा जनगणना समन्वयक मयूर पवार,करमणूक कर अधिकारी श्रीमती पाटील आदी उपस्थित होते.

  या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते म्हणाले, जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील कार्यक्रम हा 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत तर दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये राबविण्यात येणार आहे.जनगणनेच्या कामी पारदर्शकता राबवावी. माहिती संकलित करताना त्याची पुनरावृत्ती होऊ नये तसेच जनगणने बाबतीत संबंधितांनी चुकीची माहिती दिल्यास जनगणना 11 अधिनियमांतर्गंत दंडाची तरतूद असल्याची माहिती ही श्री दीक्षित यांनी यावेळी दिली.

   तर नगरपालिका क्षेत्रातील स्लम एरियाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक तपासावी .त्याचबरोबर जनगणनेच्या अनुषंगाने चेकलिस्ट नुसार कार्यवाही करावी अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी केली .

 यावेळी घर यादी व घर गणना याबाबत प्रगणक व पर्यवेक्षकांनी करवयाची कर्तव्ये याबाबत श्री  पवार यांनी पीपीटीद्वारे सादरीकरण केले.या कार्यशाळेसाठी नायब तहसीलदार नितीन धापसे - पाटील यांच्यासह जिल्ह्यातील इतर उपविभागीय अधिकारी,तहसीलदार तसेच संबंधित लिपिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes