SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शक्तीपीठ विरोधात स्वातंत्र्यदिना दिवशी तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात.. हे अभिनव आंदोलन करण्यात येणार२४ ऑगस्टला यंदा युवाशक्ती दहीहंडीचा थरार रंगणार, पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य युवाशक्ती दहीहंडीसाठी प्रथम क्रमांकाला ३ लाख रूपयांचे बक्षीस ‘गोकुळ’ च्या रक्षाबंधन परंपरेतून २० वर्षांचा ऋणानुबंध जपला...कोल्हापूर महापालिकेच्यावतीने क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना मानवंदना, श्रध्दांजली, पुष्पचक्र अर्पणनेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये एक राखी जवानासाठी उपक्रमास प्रतिसादभास्करराव जाधव वाचनालयाच्या विविध शाखांमध्ये सभासद नोंदणीस सुरुवात; मुख्य शाखेत स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रात प्रवेश सुरुकोल्हापूरच्या 'माधुरी बेकरी' ने जपलाय ऐतिहासिक वारसा...!अवयवदान प्रतिज्ञा कार्यक्रम उत्साहात जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून महिलांच्या नाविन्यपूर्ण उद्योग निर्मितीला देणार चालना : पालकमंत्री प्रकाश आबिटकरअनियमितता आढळलेल्या १२ परवान्यावर कोल्हापूर कृषी विभागाची कारवाई; अनुदानित खतांची विक्री फक्त ई-पॉस प्रणालीद्वारेच करा

जाहिरात

 

अवयवदान मोठं पुण्याईच काम : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

schedule06 Aug 25 person by visibility 217 categoryराज्य

मुंबई : “रक्तदानासारखं अवयवदानही समाजाने भीती न बाळगता स्वीकारलं पाहिजे. मृत्यू नंतर सुद्धा, अवयव रूपाने कोणाला तरी नवजीवन देणं, हे मोठं पुण्याईच काम आहे. लोकांचे प्रबोधन करून अवयवदान चळवळ अधिक गतिमान, व्यापक लोकचळवळ करूया” असे आवाहन सार्वजनिक आरोग्य  व कुटुंब  कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

केईएम हॉस्पिटलच्या सभागृहात (आरओटीटी ओ- एसओटीटीओ) संस्थेच्या वतीने जागतिक अवयवदान पंधरवडा निमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अवयवदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर, रुग्णालये, सेवाभावी संस्था तसेच अवयव रोपण केल्यानंतर विविध क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. अवयवदात्यांच्या प्रेरणादायी अनुभवांचे कथन करणाऱ्या चित्रफिती दाखवण्यात आल्या, तसेच आरओटीटीओ- एसओटीटीओ मॉडेलचे मंत्री श्री.आबिटकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

लोकांच्या मनात अवयवदानाबद्दल अकारण भीती असते, अशीच भीती पूर्वी रक्तदानाबद्दल होती. आता रक्तदान सर्वत्र केले जाते. अवयवदानाबद्दल असलेली भिती व गैरसमज सुद्धा दूर करून अवयवदान ही लोक चळवळ झाली पाहिजे. सर्व पातळीवरून लोकाचे प्रबोधन, जनजागृती केली पाहिजे. प्रबोधनाची ही चळवळ अधिक गतिमान करून किडनी, डोळे, हृदय अशा अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक लोकांना आपण नवजीवन देवूया, असे आवाहन मंत्री.श्री.आबिटकर यांनी केले.

अवयवदानाच्या क्षेत्रात काम करणारे झीटीसीसी, (आरओटीटी ओ- एसओटीटीओ), विविध रुग्णालये, तज्ज्ञ डॉक्टर, सेवाभावी संस्था यांचे कार्य उत्तम असून येत्या वर्षभरात अवयवदानाची प्रतीक्षा यादी कमी व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, आरओटीटी ओ- एसओटीटीओ चे संचालक आकाश शुक्ला यांच्यासह महाराष्ट्रातील नामांकित डॉक्टर व विविध रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी लोकमान्य टिळक रुग्णालय, सायन रुग्णालय, नायर, बी.जे. मेडिकल कॉलेज, कमांड हॉस्पिटल पुणे, इंदिरा गांधी गव्हर्नमेंट हॉस्पिटल नागपूर, एआयआय एमएस नागपूर, डी.वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे तसेच, री-बर्थ फाऊंडेशन, लिव्ह बियॉण्ड लाईफ फाऊंडेशन यांसारख्या एनजीओंच्याही योगदानाचा गौरव करण्यात आला.

अवयवदान क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉ. राहुल पंडित (एचएन रिलायन्स हॉस्पिटल) आणि डॉ. सुजाता पटवर्धन (केईम) यांना बेस्ट एनटीआरसी ॲवार्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes