SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कार्यालय पुण्याला हलवू नये; सतेज पाटील यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांच्याकडे मागणीगोकुळ शिरगांव एमआयडीसीत कंपनीतून कार्बाइड इन्सर्ट व घरफोडीचा माल चोरी करणारे दोन आरोपी जेरबंदकोल्हापुरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई!कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रारंभकोरे आर्किटेक्चर व शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रेविट कार्यशाळा संपन्नडी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकारडी. वाय. पाटील अभियांत्रिकीला क्यूएस आय- गेज गोल्ड मानांकन; शैक्षणिक गुणवत्ता, नवोपक्रम, संशोधन कार्याचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान 'शिक्षक कुटुंबांच्या आरोग्यासाठी 'धर्मवीर आनंद दिघे आरोग्य कवच योजना' आणणार,' मंगेश चिवटे यांचे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे स्पष्ट संकेत एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने रविवारी भव्य पुरस्कार वितरण सोहळा व शिक्षक मेळावामातृ मायेच्या सावलीला ७५ वर्षे पूर्ण, खासदार धनंजय महाडिक यांच्या मातोश्रींचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात

जाहिरात

 

जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कार्यालय पुण्याला हलवू नये; सतेज पाटील यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांच्याकडे मागणी

schedule01 Sep 26 person by visibility 248 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापूर येथील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कार्यालय पुणे येथे स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार सतेज पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे हे कार्यालय कोणत्याही परिस्थितीत पुणे येथे स्थलांतरित करू नये, अशी मागणी केली आहे.

याबाबत त्यांनी जलसंपदा मंत्र्यांना पत्र देऊन कोल्हापूर येथे हे कार्यालय असण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्था सक्षम करण्यासाठी तसेच मोठ्या प्रकल्पांवर गतीने नियंत्रण ठेवण्यासाठी हे कार्यालय कोल्हापुरात सुरू करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील हजारो शेतकरी व सिंचन योजनांच्या प्रश्नांसाठी या कार्यालयाची भूमिका महत्त्वाची आहे. तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांना दरवर्षी महापुराचा मोठा फटका बसतो. अशा संवेदनशील काळात धरणातून पाणी सोडण्याबाबतच्या निर्णय प्रक्रियेसाठी मुख्य अभियंता कार्यालय कोल्हापुरात असणे आवश्यक असल्याचे आमदार पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes