SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गांची कामे वेगाने पूर्ण करा : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले“सरदार@१५० एकता पदयात्रा” उपक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठकशिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शन कालावधीत विद्यार्थी व युवकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजनकोल्हापूर : अग्रवाल ट्रेडर्सकडे एकल प्लॅस्टिक आढळून आलेने पाच हजार रुपये दंड; उघड्यावर कचरा टाकणाऱ्यां नागरीकांवर दंडात्मक कारवाईकोल्हापूर महानगरपालिका : प्रारुप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरुऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी डी. वाय. पाटील विद्यापीठाला पेटंटत्रिभाषा धोरण निश्चिती समिती शनिवारी जिल्हा दौऱ्यावरआंतरजातीय, आंतरधर्मिय विवाह करणा-यांसाठी कार्यप्रणाली जाहीरशिक्षकांच्या क्रीडा स्पर्धांना 7 नोव्हेंबरपासून कोल्हापुरात प्रारंभकोल्हापूर कलाकारांची निर्मिती असलेला ' प्रलय ' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित

जाहिरात

 

राज्यसभेत खासदार धनंजय महाडिक यांनी चारधाम यात्रेबद्दल उपस्थित केला मुद्दा, केंद्रीय पर्यटन मंत्र्यांकडून मिळाली सविस्तर माहिती

schedule08 Dec 22 person by visibility 1604 categoryदेश

नवी दिल्ली : उत्तराखंड राज्यातील चारधाम यात्रेला जाणार्‍या भाविकांच्या आरोग्य सुविधेबद्दल तसेच अतिउंचीवर प्रवास करण्यासाठी असलेल्या साधनांच्या सुरक्षेबाबत आणि पायाभूत सुविधांच्या पूूर्ततेबाबत, आज खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत मुद्दा उपस्थित केला. यात्रेकरूंच्या सुखद आणि सुलभ प्रवासासाठी रोप वे ची सुविधा लवकरच पूर्णत्वास जाईल. तसेच यात्रेदरम्यान ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे भरत असल्याचे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी स्पष्ट केले.

 चारधाम यात्रेतील चार तीर्थक्षेत्र म्हणजे उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्हयातील यमनोत्री आणि गंगोत्री, रूद्रप्रयाग जिल्हयातील केदारनाथ आणि चमोली जिल्हयातील बद्रीनाथ... हजारो भाविक दरवर्षी या ठिकाणी जातात. अतिउंचावर ऑक्सिजनची कमतरता असते. शिवाय हवेचा दाब कमी असतो. अतिनिल किरणांची तीव्रता वाढलेली असते. अशावेळी या चारही तीर्थक्षेत्रावर आरोग्य सुविधा वाढवण्याची गरज असल्याकडे खासदार धनंजय महाडिक यांनी लक्ष वेधले. केंद्र सरकारने आरोग्य सुविधा वाढवल्या, तर यात्रेकरूंसह स्थानिक नागरिकांनाही लाभ होईल, असे खासदार महाडिक यांनी राज्यसभेत नमुद केले. त्यावर केंद्रीय पर्यटन मंत्री अजय भट यांनी खुलासा केला.

 दरवर्षी चारधाम यात्रेपूर्वी पर्यटन मंत्रालयाकडून आरोग्य विभागाशी संपर्क साधला जातो. यात्रेदरम्यान ठिकठिकाणी आरोग्य शिबिरं सुरू केली जातात. तसेच यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्यासाठी चोख व्यवस्था असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान राज्यसभेत बोलताना आज खासदार महाडिक यांनी चारधाम यात्रेला जाणार्‍या भाविकांच्या प्रवास व्यवस्थेविषयी सुध्दा मुद्दा उपस्थित केला. यमनोत्री किंवा केदारनाथला जाण्यासाठी पायी चालत किंवा घोडयावरून अथवा डोलीतून जाण्याचे पर्याय आहेत. मात्र डोली वाहणार्‍या गोरगरीब मजुरांची अवस्था अत्यंत बिकट असते. तर ज्या जनावरांवरून प्रवास केला जातो, त्यांची शारिरीक अवस्था सुध्दा बर्‍याचदा चांगली नसते. या जनावरांना पोटभर खाणेपिणे मिळत नसल्याने, गेल्या वर्षभरात सुमारे ६०० जनावरांचा मृत्यू झालाय. 

अशावेळी केंद्र सरकारकडून केदारनाथ आणि यमनोत्रीसाठी रोप वे सुरू होणार आहे का, आणि होणार असेल तर तो कधी सुरू होईल, याबद्दलची माहिती देण्याची खासदार महाडिक यांनी विनंती केली. त्यालाही पर्यटन मंत्री अजय भट यांनी समर्पक उत्तर दिले. सन २०१३ च्या केदारनाथमधील प्रलयंकारी महापूरानंतर, केंद्र सरकारने झपाटयाने दळणवळणाच्या सुविधा वाढवल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या कामांवर लक्ष ठेवून असून, चारधाम यात्रेकरूंना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकार पूर्ण क्षमतेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय केदारनाथ आणि हेमकुंडसाहीब या तीर्थक्षेत्रावर जाण्यासाठी केंद्र सरकारकडून रोप वे ची सुविधा लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. त्यामुळं चारधाम यात्रा अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल, असा विश्‍वास केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes