कोल्हापूरच्या विकासाला गती देण्यासाठी व्यावसायिक अभियंत्यांनी पुढाकार घ्यावा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
schedule09 Jun 25 person by visibility 126 categoryसामाजिक

कोल्हापूर : बिल्डर्स असोसिएशन ऑफ कोल्हापूर चॅप्टरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण घेतलेला हा उपक्रम आपण सुरू केलेले हे सगळं काम बिल्डर्स ऑफ इंडिया कोल्हापूरच्या आणि महाराष्ट्राच्या देशाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. आजच्या काळातली परिस्थिती बघितली त्यांनी पूर्वीच्या काळातले सगळे संदर्भ बघितले इंजीनियर असणारे लोक ४० वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर तेच सगळेजण आलेले आहेत त्यांचे मध्ये सिव्हिल मध्ये काम करणारी लोक जसे धरण बांधणाऱ्या पासून ते छोटे-मोठे काम करणारे सगळे काम करणारे त्याच्यानंतर सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये ज्या पद्धतीचे नवीन नवीन प्रायव्हेट मध्ये बदल आहेत इतक्या चांगल्या पद्धतीने देशी पातळीवरील जगात सुद्धा ज्या डेव्हलपमेंट पाहायला मिळेल चांगल्या पद्धतीने आर्किटेक्चर मध्ये खूप चांगले प्रोजेक्ट करणारे लोक आहेत. नाशिक मध्ये डेव्हलपमेंट बघतोय आणि त्या सगळ्यांमध्ये त्याच पद्धतीने कोल्हापूरचे व्हिजन ठरले पाहिजे असे पालकमंत्री ना.श्री.प्रकाश आबिटकर यांनी बोलून दाखविले बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या कोल्हापूर सेंटरच्या वतीने नव्याने निवडण्यात आलेल्या पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्यांचा पदग्रहणसमारंभ तसेच कोल्हापुरातील जेष्ठ बांधकाम व्यावसायिकांना जीवन गौरव पुरस्कार अर्पण आणि उत्कृष्ठ वास्तू निर्मिती पुरस्कार प्रदान समारंभ रेसिडेन्सी क्लब, कोल्हापूर येथे पार पडला. पालकमंत्री त्यावेळी बोलत होते.
नाशिक ,नागपूर, ठाणे ,मुंबई, पुणे या शहरांच्या विकासाला गती देण्याचे काम अभियंते ,व्यावसायिक वास्तू विशारद यांनी केलेले आहे कोल्हापूर शहरात विकासाचे नवनवे प्रकल्प सुरू आहेत दळणवळण पायाभूत सुविधा यांचा विकास होत आहे या विकासाला दिशा देण्याचे काम बांधकाम व्यवसायिकांनी करावे असे उदगार पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढून आपण सगळेच पुढे येणे आवश्यक आहे. आज या ठिकाणी खूप मेहनत घेऊन काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला हे गरजेचे आहे.असे सांगून नागेशकर कुटुंबीयांचा पूर्वीपासूनचा धरणापासून आजपर्यंत एकूण काम आणि अनुवंशिकतेने दुसऱ्या पिढीने सुद्धा त्यांच्या पद्धतीने त्या सगळ्या खूप चांगले योगदान कोल्हापूरच्या आणि या परिसराचे विकासासाठी दिलेले आहे असे सांगितले. जीवन गौरव पुरस्काराच्या निमित्ताने सन्मानित करत असताना ज्या पद्धतीची प्रेरणा इतरांना मिळेल त्यामुळे निश्चितपणे त्यांचा सत्कार लोकांच्या आणि कोल्हापूरच्या विकासामध्ये बदल करेल आज शंकर पाटील यांचा सत्कार केला पाटील साहेब पार्श्वनाथ बँक असेल सहकार असेल कृषी असेल सगळ्यांमध्ये पारंगत असणारी व्यक्ती आहे.आणि आम्हाला सगळ्या राजकारणाच्या साठी सुद्धा मार्गदर्शक आहे. त्याचा उल्लेख कोणी केला नाही परंतु या सगळ्या क्षेत्रात असताना सुद्धा क्वालिटी त्यांनी सांभाळली असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखविली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबाचा आराखड्याला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे मागणीला यश आले आहे.त्यामुळे भविष्य काळामध्ये महालक्ष्मीला येणाऱ्या लोकांचा खूप मोठा ओढा वाढणार आहे.
पुणे मुंबईतील विमानतळ विस्तार वाढला आहे तसेच कोल्हापूरची विमानतळ ही चांगल्या पद्धतीने विकसित होत आहे आणखी विकसित करण्यासाठी व्यावसायिकांनी कोल्हापूरच्या विकासाला गतिमान करणे आवश्यक असल्याचे सांगितले. हद्द वाढीचा प्रश्न आहे आयटी पार्क चा प्रश्न आहे या सर्वात दिशा देण्यासाठी आपल्या सर्वांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील, स्टेट चेअरमन जगनाथ जाधव व क्रीडाई उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विद्यानंद बेडेकर, जनसंपदा अधिकारी अभिषेक म्हेत्रे,बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर सेंटरचे नूतन चेअरमन विजय कोंडेकर,व्हाइस चेअरमन अमोल कुलकर्णी,जी,सी,मेंबर श्री.प्रताप बापू कोंडेकर, माजी चेअरमन श्री.मदन भंडारी आदी उपस्थित होते.माजी चेअरमन राजीव लिंग्रस उपस्थित होते.
या नव्या पदाधिकारी व कार्यकारणीच्या पदग्रहन समारंभाबरोबरच बांधकाम क्षेत्रात आपल्या अतुलनीय कर्तुत्वाने नावलौकिक कमवलेले व कोल्हापूर शहराच्या जडणघडणीचे पहिले शाहूकालीन आर्कीटेक्ट कै. श्री. रामराव गोविंद नागेशकर ज्यांनी राधानगरी धरण, शालिनी पॅलेस, संपूर्ण राजारामपुरीची रचना व बऱ्याच महत्वाच्या वास्तूंचे रचनाकार म्हणून केलेल्या कार्याबद्दल त्यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांकडे प्रदान करण्यात आला.तसेच बांधकाम क्षेत्राशी निघडीत व आधुनिक बांधकाम साहित्य चे शिल्पकार सुरेश गुळवणी (खतेन्द्र वितरक) यांना जीवनगौरव पुरस्कार त्याचबरोबर उत्कृष्ट वास्तुनिर्मिती पुरस्कार श्री. शंकर हिंदुराव पाटील व श्री. संजय चंद्रकांत चव्हाण यांना प्रदान करण्यात आला.
त्याचबरोबर कोल्हापूर चे भूषण असणारे उज्वल नागेशकर व अशोक रोकडे (व्हाईट आर्मी) यांना “जीवन-दूत” हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.शिवाय कोल्हापूर ते लंडन पर्यावरण सुरक्षित रहावे हे घोषवाक्य घेऊन केलेल्या प्रवासाबद्दल हेमंत शहा, प्रताप बापू कोंडेकर, आणि मदन भंडारी यांचाही गौरव करण्यात आला.पुरस्काराचे यावर्षीचे हे १० वे वर्ष होते.
प्रास्ताविक आणि स्वागत कोल्हापूर चॅप्टरचे संस्थापक माजी चेअरमन प्रताप बापू कोंडेकर यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी बिल्डर असोसिएशन विषयी विस्तृत माहिती सांगितली. सेंटरच्या माध्यमातून समाजाची कामे बांधकाम व्यवसायिकांची जी काही अडचणी असतील समस्या असतील त्यावर काम केलेले आहे.शिवाय पुरस्कार प्राप्त सर्वांची माहिती उपस्थितांसमोर सांगितली. कोल्हापूरला विकास करण्यासाठी पालकमंत्री म्हणून प्रकाश आबिटकर आपण निधी आणाल आणि कोल्हापूरला येणाऱ्या महापुराबाबत निवृत्त अधिकाऱ्यांना एकत्र घेऊन बैठक घेऊन चांगले काम कराल अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी आम्ही बिल्डर्स असोसिएशन कोल्हापूर सेंटर आपल्याला सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.
संघटनेची कोल्हापूर शाखेची १४ वर्षापूर्वी स्थापना करण्यात आली असून बांधकाम व्यावसायिकांच्या समस्यांची बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून शासन दरबारी उकल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. आगामी काळात या संघटनेच्या माध्यमातून नवनवीन प्रकल्पांची उभारणी करणे. विविध संघटनात्मक उपक्रम राबविण्याची कोल्हापूर शाखेचे उद्दिष्टे आहेत असेही प्रताप बापू कोंडेकर यांनी सांगितले.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर सेंटरचे माजी चेअरमन राजीव लिंग्रस यांनी अथक परिश्रम कार्यक्रमासाठी घेतले. माजी चेअरमन मदन भंडारी आदी यांनी आभार मानले.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर सेंटर चे नूतन चेअरमन विजय कोंडेकर यांच्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ पार पडला.
▪️नवीन कार्यकारिणी अशी
चेअरमन विजय कोंडेकर व्हाईस चेअरमन अमोल कुलकर्णी ट्रेझरर रणजीत पाटील, सेक्रेटरी उमेश शेठ, संचालकमध्ये संग्रामसिंह निंबाळकर, ऋतुराज पाटील, राजेश डाके, स्वप्नील पाटील,अनिकेत आगळगावकर, अशोक तहसीलदार, अनिकेत कोंडेकर आदींचा समावेश आहे. या सर्वांना उपस्थित मान्यवरांकडून पुष्पगुच्छ देऊन दोन वर्षासाठी कारभार सोपविण्यात आला.