SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
39 वा राजर्षी शाहू पुरस्कार प‌द्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना घोषितकृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून महिलांसाठी उभारली जाणार स्वच्छ, सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहे, वोलू संस्थेशी सामंजस्य करारकोल्हापूर महानगरपालिकेचे लसीकरण व आरोग्य सेवेमध्ये चांगले काम : पालकमंत्री प्रकाश आबिटकर; पाच नागरी आयुष्मान आरोग्य मंदिराचा आज प्रारंभशिवाजी विद्यापीठात डॉ. बापूजी साळुंखे यांची जयंतीकोल्हापूरच्या विकासाला गती देण्यासाठी व्यावसायिक अभियंत्यांनी पुढाकार घ्यावा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला फोटोकेटालिटिक डाई विघटनासाठी पेटेंट दिव्यांग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार, 15 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनतापमानात 14 जूनपर्यंत वाढ, काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नयेछत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट हा प्रेरणादायी प्रवास : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, राधानगरी तालुक्यातील घटना

जाहिरात

 

तापमानात 14 जूनपर्यंत वाढ, काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

schedule09 Jun 25 person by visibility 114 categoryराज्य

मुंबई : गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे, आणि किमान 15 जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. यामुळे 14 जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, आणि खानदेशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. या दरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊन ते 45 अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे, तर विदर्भातील बऱ्याच भागात कमाल तापमान 40 अंशापेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि खानदेशातील अनेक भागात कमाल तापमान 40 अंशाच्या आसपास राहण्याचा अंदाज देखील आहे.

14 जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक आणि मान्सूनचा पाऊस अपेक्षित नाही. पाऊस हा प्रामुख्याने दुपार नंतर आणि मेघ गर्जनेसह काही भागातच पडेल, ज्याची शक्यता या आठवड्याच्या सुरुवातीला दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य-महाराष्ट्रात अधिक राहील. तुलनेत राज्यातील इतर भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

या दरम्यान कमाल तापमान अधिक राहणार असल्यामुळे आणि सार्वत्रिक मान्सूनचा पाऊस अपेक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes