SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वेदनेचे समाजशास्त्र समजून घेण्याची गरज : ‘जेएनयू’तील प्रा. विवेक कुमार यांचे मत; प्रा. जगन कराडे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कारडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची आयआयटी दिल्ली येथे युथ आयडियाथॉन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यशस्वी कामगिरीछत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपतींच्या राजकोट येथील पुतळ्याचे दर्शन व पूजनस्टार एअरने कोल्हापूरला बेंगळुरू, हैदराबाद व नागपूर या मेट्रो सिटीशी विमान सेवेतून जोडलेफिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांची ‘मेटाफर’ यशवंत लघुपट महोत्सवात झळकली!‘केआयटी’ चा विद्यार्थी शाहू माने शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानितकळंबा येथे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाततामगांव ते उजळाईवाडी रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद केरळमध्ये २७ मेपर्यंत मान्सूनचे आगमनभारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ सातारा जिल्ह्यात रविवारी तिरंगा रॅलीचे आयोजन : पालकमंत्री शंभूराज देसाई

जाहिरात

 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे भारतीय लोकशाहीला मिळाला न्याय, महायुतीला पुन्हा मिळणार निर्विवाद जनाधार, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास

schedule07 May 25 person by visibility 255 categoryराजकीय

कोल्हापूर  : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घ्याव्यात, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशामुळे लोकशाहीला न्याय मिळाला असून, राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि मतदार यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. गेली चार वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. त्यामुळे अनेक विकास कामे रखडली होती. अशा परिस्थितीत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये अत्यंत पारदर्शी आणि वस्तुस्थितीजन्य भूमिका घेत,  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे  गरजेचे आहे, याबद्दल आग्रही सादरीकरण केले.  त्यामुळेच आज सर्वोच्च न्यायालयाने थेट आणि स्पष्ट भूमिका घेऊन, महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. 

एक अर्थाने हा मतदार राजासाठी आनंदाचा दिवस आहे. ज्या पद्धतीने राज्यातील विधानसभा निवडणुकात भाजप - शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन महायुतीच्या माध्यमातून जनतेसमोर जात निर्विवाद कौल मिळवला, त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळेल, याची खात्री वाटते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर देशभरातील जनतेने तिसऱ्यांदा विश्वास दाखवला. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित  पवार यांच्या ट्रिपल इंजिन सरकारने, जनहिताच्या अनेक योजना यशस्वी केल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अगदी ग्रामपंचायत निवडणुकीतही महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, याची खात्री आहे. गाव पातळीपासून ते शहर, राज्य आणि देशपातळीवर भाजप सरकारने विकासाचा आलेख उंचावला आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला संपूर्ण बहुमत मिळेल,  याचा विश्वास वाटतो.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes