SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात १७ मे रोजी निघणार तिरंगा पदयात्राएसएसएसी बोर्ड परिक्षेत डीकेटीईच्या हायस्कूल विभागाचा राज्यात ठसा - रुजूल कनूंजे याने मिळविले १०० टक्के गुणडीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींगमधील ३ विद्यार्थ्यांची शासकीय विभागात नोकरीसाठी निवडराजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवारी रोजगार मेळाव्याचे आयोजनपी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी ३१ मे पर्यंत विशेष मोहीमअंबाबाई मंदिरमध्ये वस्त्र संहिता लागू केल्याबद्दल सकल हिंदू समाज, हिंदुत्ववादी संघटनांकडून आनंदोत्सवखेलो इंडिया यूथ गेम्समध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या ऐश्वर्याचे सुवर्ण!कोल्हापूर विमानतळाला ‘छत्रपती राजाराम महाराज’ यांचे नाव देण्यासाठी प्रयत्नशील : केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ१८५७च्या लढ्याचे आद्य क्रांतिकारक कोल्हापूरचे छत्रपती चिमासाहेब महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनकोल्हापुरातअट्टल मोटर सायकल चोरट्यास अटक; ७ मोटर सायकली जप्त

जाहिरात

 

खरीप हंगाम पीक स्पर्धेत सहभागी व्हावे

schedule27 Jul 22 person by visibility 150 categoryराज्य

कोल्हापूर : राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील खरीप हंगाम 2022 साठी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी अर्ज सादर करुन पीक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

पिक स्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिके- भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल अशी एकूण 11 पिके समाविष्ट आहेत. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या- सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 आहे. पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थींच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.  पुरेसे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील. 

तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या- सर्वसाधारण गटासाठी 5 व आदिवासी गटासाठी 4 आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. 

प्रवेश शुल्क- सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी 300 रुपये रक्कम आहे.  अर्ज दाखल करण्याची तारीख- मूग व उडिद पीक- 31 जुलै 2022. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल- 31 ऑगस्ट 2022
पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहीत नमुन्यामध्ये भरुन त्यासोबत ठरवून दिलेले शुल्क चलन, 7/12, 8 अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करुन कृषी कार्यालयात द्यावे. 

तालुका पातळीवर पीकस्पर्धा विजेत्यांसाठी पहिले 5 हजार, दुसरे 3 हजार व तिसरे 2 हजार रुपये. जिल्हा पातळीवरील पहिले 10 हजार, दुसरे 7 हजार व तिसरे 5 हजार रुपये इतके तर विभाग पातळीवर पहिले 25 हजार, दुसरे 20 हजार व तिसरे 15 हजार रुपये त्याचबरोबर राज्य पातळीवरील पहिले 50 हजार, दुसरे 40 हजार व तिसरे 30 हजार रुपये इतके बक्षीस असेल.
पीक स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 

अधिक माहितीसाठी संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी कार्यालयातर्फे करण्यात आले.  


जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes