SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अवकाश संशोधनाला गती देण्यासाठी प्रा. राजमल जैन यांच्या विशेष व्याख्यानांचे शिवाजी विद्यापीठाकडून आयोजनडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ३ विद्यार्थ्यांना २७ लाखांचे पॅकेजकारगिल विजय दिवस उत्साह आणि अभिमानाने साजरायेणाऱ्या काळात आरोग्यसेवेसाठी खर्चच करावा लागणार नाही : खासदार डॉ. श्रीकांत शिंदेकोल्हापूर जिल्ह्यात ९ ऑगस्ट पर्यंत बंदी आदेश लागूडीकेटीईमध्ये प्रथमवर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्यास उत्स्फुर्त प्रतिसादस्वप्ने मोठी पहाः विनायक भोसले; घोडावत विद्यापीठात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागतराधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडलेमाजी सैनिक सुरक्षा रक्षकांचा थकीत वेतन फरक विद्यापीठ फंडातून द्या; आमदार सतेज पाटील यांची उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणीकाँग्रेसचा मेळावा यशस्वी करूया; माजी नगरसेवकांच्या बैठकीत निर्धार

जाहिरात

 

कारगिल विजय दिवस उत्साह आणि अभिमानाने साजरा

schedule26 Jul 25 person by visibility 210 categoryसामाजिक

▪️शहीद जवानांच्या सर्वोच्च त्यागाचे स्मरण करून त्यांच्या स्मृतींना वंदन

कोल्हापूर : भारतीय लष्कराच्या शौर्याचे आणि बलिदानाचे प्रतीक असलेला 26 वा कारगिल विजय दिवस आज उत्साहात व अभिमानाने जिल्हा सैनिक कार्यालय आणि जिल्हा प्रशासनातर्फे साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात हा 26 वा कारगिल विजय दिवस जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा स्मारकावर आदरांजली अर्पण करून आणि शहिदांना श्रद्धांजली वाहून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कारगिल युद्धातील शहिदांच्या वारसांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, कोल्हापूर ओ.आय.सी.ईसीएचएस ले. कर्नल विलास सुळकुडे (निवृत्त), जिल्हा सैनिक अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन विलास चवदार तसेच कारगिल युद्धातील शहिदांचे वारस, वीरमाता, वीरपत्नी, माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी, माजी सैनिक, जिल्हा सैनिक कार्यालयाचे कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय सेनेतील शहिदांप्रति कृतज्ञता व्यक्त करत जिल्ह्यातील सैनिकांचा अभिमान असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, जिल्हा प्रशासनातर्फे सैनिकांचे प्रश्न तत्परतेने सोडवले जातील. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी प्रास्ताविकात भारतीय सैनिकांनी 1999 मधील कारगिल युद्धात केलेल्या अतुलनीय पराक्रमाची आणि विजय दिवसाची माहिती दिली. शहीद जवानांच्या सर्वोच्च त्यागाचे स्मरण करून त्यांच्या स्मृतींना वंदन करत ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा देण्यात आल्या. जिल्हा प्रशासनामार्फत सैनिकांचे प्रश्न तत्परतेने सोडवले जात असल्याचे सांगून त्यांनी सर्व सैनिकांच्या वतीने प्रशासनाचे आभार मानले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक प्रकाश गुरव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes