SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सुरळीत पाणीपुरवठा, दर्जेदार रस्ते व स्वच्छतेला प्राधान्य द्या : पालकमंत्री प्रकाश आबिटकर जागतिक अन्न दिनानिमित्त विद्यापीठात १५ ऑक्टोबरपासून प्रदर्शन, फेअर ट्रेड कार्यक्रमकोल्हापुरात खड्ड्यांचा वाढदिवस! शाहू सेनेकडून ‘हॅपी बर्थडे खड्डे’ आंदोलनात महापालिकेचा निषेधवाचन ही सवय नव्हे; तर संस्कृती : प्रा. मनोज बोरगावकर; दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्रात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ऑनलाइन व्याख्यानफॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली भरघोस परताव्याचे आमिष दाखवून फसणुक करणाऱ्या मुख्य फरार आरोपी अटक नागरिकांनी आरोग्य शिबिरातील मोफत सुविधांचा लाभ घ्यावा : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरनियोजनबद्ध शेतीतून उत्पादकता वाढ शक्य : पालकमंत्री प्रकाश आबिटकरडी.वाय.पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग- फिजीओथेरपी संघ विजेते; डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धाराष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाला गटस्तर विजेतेपद; आठ विद्यार्थ्यांना ‘बेस्ट प्रेझेंटर’ पुरस्कार...अचानक मध्यरात्री आमदार क्षीरसागर यांच्याकडून रस्त्याच्या कामाची पाहणी; अनुपस्थित अधिकारी आणि ठेकेदारास सुनावले खडे बोल

जाहिरात

 

वाचन ही सवय नव्हे; तर संस्कृती : प्रा. मनोज बोरगावकर; दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्रात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ऑनलाइन व्याख्यान

schedule13 Oct 25 person by visibility 66 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : उत्तम पुस्तक वाचनाबरोबर माणूस आणि निसर्ग वाचता आला पाहिजे. पुस्तक वाचून माणूस समृद्ध होतो. म्हणून वाचन ही सवय नसून संस्कृती असल्याचे प्रतिपादन नांदेड येथील लेखक, कादंबरीकार आणि कवी प्रा. मनोज बोरगावकर यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या वतीने “वाचन प्रेरणा दिन” निमित्त ‘वाचन संस्कृती आणि “नदीष्ट”ची निर्मितीप्रक्रिया’ या विषयावर डॉ. बोरगावकर यांचे ऑनलाईन व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. कुलसचिव डॉ. विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपकुलसचिव विनय शिंदे, मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ.रणधीर शिंदे, सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. एकनाथ अंबोकर, डॉ. रमेश साळुंखे, युवराज कदम आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींसह साहित्यरसिक व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. बोरगावकर म्हणाले, वाचनातूनच संवेदनशीलता निर्माण होते आणि समाज बदलण्याची शक्ती जन्माला येते. आपली इमान आणि निष्ठा शाबूत ठेवायला वाचन कारणीभूत असते. ‘नदीष्ट’ कादंबरीतील विविध प्रसंगांचे संदर्भ देत तिची सर्जनशील निर्मिती प्रक्रिया, निसर्गाशी तीच असलेलं नातं आणि त्यावरील वाचकांच्या प्रतिक्रियांचा अनुभव कथन केला. ‘नदीष्ट’ कादंबरी ही केवळ कथा नसून, मानवी निसर्ग, वेदना, नाती आणि समाज यांचा सखोल शोध आहे, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, वाचन हीच खरी विचारशक्तीची जननी आहे. लेखक आणि निसर्ग यांचे नाते जितके जिव्हाळ्याचे, तितक्याच तीव्रतेने त्यांच्या लेखनातून जीवन उलगडते. प्रा. बोरगावकर यांनी साहित्य, पर्यावरण आणि शैक्षणिक जबाबदारी यांचा सुंदर मेळ घालून युवा पिढीसाठी मार्गदर्शक विचार मांडले.

यावेळी दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ.कृष्णा पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रवीण लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. चांगदेव बंडगर यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes