+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule27 Sep 24 person by visibility 590 categoryराजकीय
 कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादीने काही जागा मागितल्या आहेत. जिथे ज्याची ताकद, तिथे त्याला जागा सोडली जाईल, असे स्पष्ट करत या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक बळ कोल्हापूर जिल्हाच देईल, असा विश्वास काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केला.

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार पाटील यांनी राज्यात महाविकास आघाडीचे १५० जागांवर एकमत झाल्याचेही स्पष्ट केले.

आमदार पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार यावे ही लोकांची इच्छा असून राज्यातील आताची परिस्थिती बदलण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. महाविकास आघाडीचे १५० जागांवर एकमत झाले असून उर्वरित जागांचा निर्णयही ३० व ३१ सप्टेंबरच्या बैठकीत होईल. 

कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या काही जागा अंतिम झाल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीने काही जागा मागितल्या आहेत. काँग्रेसनेही काही जागांवर दावा केला आहे. ज्याची जिथे ताकद असेल त्याला ती जागा सोडली जाईल. विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात महाविकास आघाडी सर्वाधिक भक्कम दिसेल.

🟣 मुख्यमंत्रिपदापेक्षा शाश्वत सरकारला प्राधान्य
मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नाही. सर्वच पक्षांना मुख्यमंत्रीपद मिळावे असे वाटते, त्यात काही गैर नाही. मात्र, या पदापेक्षा शाश्वत सरकार देणे यालाच आमचे प्राधान्य राहील. महाविकास आघाडी हा मोठा भाऊ म्हणून निवडणुकीत उतरेल, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

🟣 पश्चिम महाराष्ट्रात ४५ हून अधिक जागा जिंकू
लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. आगामी विधानसभा निवडणुकीतही ५८ पैकी ४५ हून अधिक जागा जिंकू असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.